शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Nitin Gadkari: पालखी मार्गांचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करणार; नितीन गडकरी यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 14:41 IST

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २३५ आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३७ किलोमीटरचा असून दोन्हींसाठी १३ हजार कोटींचा खर्च

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दाेन्ही पालखी मार्गांचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले असून, काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न कायम आहे. हा प्रश्नही लवकर सुटून येत्या डिसेंबरअखेर दोन्ही पालखी मार्गांचे पूर्ण होऊन नवीन वर्षात त्यांचे उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. गडकरी यांनी या दोन्ही मार्गांच्या कामाची हवाई पाहणी केल्यानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. हवाई पाहणी वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २३५ किलोमीटरचा असून त्याचे सहा टप्पे आहेत. यासाठी आठ हजार कोटींचा खर्च येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे काम करत आहे. त्यातील पाच टप्प्यांचे काम सुरू झाले आहे. सहावा टप्पा हडपसर ते दिवे घाट असून, हा रस्ता महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यासाठी महापालिका व राज्य सरकारशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यात येईल. या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध झाली असून, भूसंपादनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मोहोळ ते वाखरी या टप्प्यासाठी दीड हजार कोटींचा खर्च येणार असून, हे काम ९१ टक्के पूर्ण झाले आहे. तर वाखरी ते खुडूस टप्प्याचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. कुडूस ते धर्मपुरी हे १२०० कोटींचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. धर्मपुरी ते लोणंद हे काम केवळ ४८ टक्के तर लोणंद ते दिवे घाट हे १८०० कोटींचे काम २० टक्केच झाले आहे.’

संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी तीन टप्पे

तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग १३७ किलोमीटरचा असून, याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यासाठी पाच हजार कोटींचा निधी देण्यात येणार आहे. यातील देहू ते हडपसर हा मार्ग दोन्ही महापालिकांच्या हद्दीतून जात आहे. हा शहरी मार्ग असल्याने तो सुधारण्याबाबत महापालिका व राज्य सरकारशी चर्चा करण्यात येईल, असे स्पष्ट करून हडपसर ते कासुर्डी हा राष्ट्रीय महामार्ग ६५ असून, हा मार्ग चारवरून सहा पदरी करण्याचे काम सुरू आहे. पालखी मार्गात पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर व इंदापूर ते तोंडले बोंडसे अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे. त्यातील पाटस ते बारामती टप्प्याचे काम ८५ टक्के, बारामती ते इंदापूर ४४ तर इंदापूर ते तोंडले बोंडले टप्प्याचे काम ४१ टक्के पूर्ण झाले असून, येत्या तीन महिन्यांत या दोन्ही मार्गाचे बहुतांश काम पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. या दोन्ही मार्गांवर सुमारे १९ हजार झाडे लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय कासुर्डी ते पाटस हा मार्गही चार पदरी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याचा पालखी मार्गात समावेश केलेला नाही.

जीएसटी माफ करावा

पुण्यासाठी सुमारे ५३ हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असून, त्यासाठी राज्य सरकारने स्टील व सिमेंटवरील जीएसटीत सूट द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच उजनी धरणातून वाळू उपशास परवानगी दिल्यास रस्त्यांच्या कामात त्याचा वापर करता येईल. यामुळे उजनीच्या खोलीकरणाचे कामही होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीPoliticsराजकारणsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीhighwayमहामार्ग