शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मैत्रीपूर्ण संबंधासाठी पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे : लष्कर प्रमुख बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 18:22 IST

मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ दीक्षांत संचलन सोहळा  प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पदे देण्यासाठी प्रयत्नशील 

पुणे : पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल  पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे. या पुढे जर पाकिस्तानला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्यांनी एक पाऊल पुढे येणे गरजेचे असून यासोबतच स्वत:ला ‘इस्लामिक' राष्ट्र न म्हणवता, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करावी, असा उपरोधिक टोला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला लगावला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील १३५ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रावत बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाप्रसंगी भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित व्हावे अशी इच्छा असल्याचे व्यक्त केले. या साठी भारताने पहिले पाऊल टाकावे अशी अपेक्षा व्यक्त करत असे झाल्यास आम्ही दोन पावले टाकू असे विधान केले होते. या बाबत त्यांना प्रश्न विचारला असता रावत म्हणाले, आतापर्यंत भारताने पाकिस्तान सोबत कायम सौदाहार्याची भावना ठेवली आहे. दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी एक पाऊन पुढे येऊन भारताने पुढाकार घेतला आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.  मात्र, पाकिस्तान स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणवते. अधिका-यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी प्रबोधिनीत हे नवे तंत्र तसेच शस्त्रास्त्रे आणली जात आहे. प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, असेही रावत म्हणाले. .......................सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपीपदे देण्यासाठी प्रयत्नशील सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पणे देता येईल का याचा विचा सुरू आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. प्रत्यक्ष  युद्धभीमीवर महिलांना नियुक्त करणे सद्यस्थितीत शक्य नाही. मात्र, मानसशास्त्र, भाषा अनुवादक, लेखापाल, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत महिला चांगले काम करू शकतात. या साठी महिला अधिका-यांचा विचार होत आहे. लवकरच याबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.  सैन्य दलातील बरेचसे जवान हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांप्रमाणे महिलांसोबत काम करण्याची मानसिकता अजून त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांची नियुक्ती नाही, असेही रावत यांनी स्पष्ट केले. ...................... 

टॅग्स :PuneपुणेBipin Rawatबिपीन रावतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान