शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

काश्मीर मधील पर्यटकांना महाराष्ट्रात सुरक्षित आणा - अमोल कोल्हे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 09:45 IST

पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर श्रीनगर, पुलवामासह काश्मीरमध्ये विविध ठिकाणी पर्यटक अडकून पडले

नारायणगाव : पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर काश्मीरच्या विविध भागांत अडकून पडलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्राद्वारे केली आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड व हवेली तालुक्यातील अनेक पर्यटक काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. काल पहेलगाम येथे अतिरेकी हल्ला झाल्यानंतर श्रीनगर, पुलवामासह काश्मीरमध्ये विविध ठिकाणी पर्यटक अडकून पडले आहेत. मात्र अतिरेकी हल्ल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून दुकाने, वाहतूक आदी पूर्णतः बंद केली आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना विमानतळ, रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचता आले नाही. परिणामी पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवेली आणि खेड तालुक्यातील पर्यटकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी पर्यटकांशी मोबाइल कॉल करुन चर्चा करीत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर श्रीनगरच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून पर्यटकांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र पाठवून काश्मीरमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील पर्यटकांना सुरक्षित महाराष्ट्रात परत येण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील पर्यटकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य असून त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे स्पष्ट करीत त्यांच्या नातेवाइकांना आश्वस्त केले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला