शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुलंनी विनोदाला विसंगतीकडून सुसंगतीकडे नेले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 16:12 IST

पु.ल.देशपांडे यांनी विनोदाला व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम केले. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे ते व्यक्तिमत्व होते.

पुणे : पु.ल.देशपांडे यांनी विनोदाला व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम केले. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे ते व्यक्तिमत्व होते. त्यांच्या चांगुलपणाला प्रज्ञा- प्रतिभेची जोड होती. मराठी माणसाच्या कलेची आनंदनिधाने त्यांनी जोपासली’, अशी भावना मान्यवरांनी परिसंवादात व्यक्त केली. 

                   पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आयोजित पुलोतत्सवात ‘देणे पु. लं.चे’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात दिनकर गांगल, रामचंद्र देखणे, प्रा. मिलिंद जोशी, ज्योती सुभाष सहभागी झाले होते. मंगला गोडबोले यांनी मान्यवरांशी संवाद साधला.गांगल म्हणाले, ‘पुलंनी आपली हृदये काबीज केली. पुलंवर महाराष्ट्राने भक्ती केली. त्यांच्यावरही सुरूवातीच्या काही काळात टीका झाली; पण पुलंचा सच्चेपणा नंतर प्रतीत होत गेला. १९७५ च्या दरम्यान पुल आणि महाराष्ट्र एकमेकांशी बांधले गेले. ग्रंथालीच्या गावोगावी होणा-या ग्रंथ प्रदर्शनात पुस्तकं, कॅसेट्स अशा विविध माध्यमांतून पुलंचा सहभाग असायचा. पुलंना माध्यमांची अचूक जाण होती. त्यांच्या चांगुलपणाला प्रज्ञा- प्रतिभेची जोड होती.’

रामचंद्र देखणे म्हणाले, ‘तिशीच्या आत पुलंनी तुकाराम हे नाटक लिहिले. यावरून संत साहित्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी लक्षात येते. पुलंची विविध रूपे आपल्यासमोर येतात; पण मी त्यांच्याकडे एक तत्वज्ञ म्हणून बघतो. व्यंगातून अव्यंगाकडे, विसंगतीकडून सुसंगतीकडे नेण्याचे काम पुलंनी केले. त्या विनोदामागे तत्वज्ञान असते,  हे मान्य करावे लागेल. समाजात विकृती आणि चमत्कृती असते. त्यातून निर्माण होणा-या विनोदामागे तत्वज्ञानाचे बीज असते. तत्वज्ञान हे आत्मरक्षा होते.’

             प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘मराठी साहित्यिक आणि साहित्यविषयक संस्थांमध्ये पुलंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आवाज न चढवता आणि कठोर शब्द न वापरता पुलंनी कायम आपली भूमिका घेतली. मुक्त कंठाने दुस-याची स्तुती करण्यासाठी मनाचा मोठेपणा, दुस-यांच्या कलेकडे पाहण्याची निखळ दृष्टी पुलंनी कला आणि साहित्यविश्वाला दिली. नवलेखकांना ते नेहमीच प्रोत्साहन द्यायचे.  ग्रामीण भागातील धडपड्या व्यक्ती आणि संस्थांना ते विविध स्वरूपाच्या माध्यमातून मदत करत होते. समाजातील सगळ्या प्रवाहांशी एकरूप होऊन सर्जनशीलपणे वावरणारे व्यक्तिमत्व होते.’ 

               ज्योती सुभाष म्हणाल्या, ‘पुल नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टसचे संचालक झाले, त्यावेळी त्यांचे कलागुण जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. पुलंची सृजनशीलता प्रत्येक दिशेने जाणारी होती. ते लहान मुलासारखे निष्पाप होते, त्यांच्या कलेमध्ये खूप शुद्धता होती.  पुलंनी चांगुलपणाला आधुनिकतेची जोड दिली.’गोडबोले म्हणाल्या, ‘पुल स्वत: च्या अपयशाकडेही मिस्कीलपणे बघायचे.  रोजचा दिवस गोड करण्याचे तत्वज्ञान पुलंनी महाराष्ट्राला दिले. आधुनिक तत्वज्ञानाचा चेहरा म्हणजे पुलं. एकाचवेळी लोकल आणि ग्लोबल अशा पातळ्यांवर पोहोचलेले व्यक्तिमत्व होते.  मराठी माणसाच्या कलेची आनंदनिधाने त्यांनी जोपासली. पुलंना स्वातंत्र्याचे विलक्षण आकर्षण होते.’ उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक