शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

द्राक्ष बागायतदारांची संकटावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 3:26 AM

हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे.

बारामती : हक्काचे उत्पादन मिळवून देणा-या फळबागा अवकाळीच्या संकटामुळे शेतक-यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. फळबागांवर खर्च करणे म्हणजे जुगारावर पैसे लावण्याचा अनुभव शेतक-यांना येत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे द्राक्ष, डाळिंब बागांवर आता परिणामझाला होता. मात्र योग्य नियोजनामुळे शेतकºयांनी याही संकटावर मातकेली आहे.बाजारात द्राक्षाचे दर चढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.उसाचे आगार म्हणून ओळखले गेलेल्या बारामती-इंदापूर तालुक्यांच्या बागायती पट्ट्यात द्राक्ष बागांनी क्षेत्र व्यापले आहे, तर जिरायती भागाला वरदान ठरलेल्या डाळिंबाने येथील शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावला. मात्र द्राक्ष बागांना सातत्याने अवकाळी पावसाचा व खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या वर्षीदेखील लांबलेल्या पावासाचा परिणाम द्राक्ष बागांवर झाला होता. त्यातूनही शेतकºयांनी मेहनतीने बागा जपल्या होत्या. मात्र मागील आठवड्यातील अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदारांची झोप उडवली होती. आगाप बागांमध्ये मणी फुटण्याचे प्रकार घडले तर उशिरा छाटण्या केलेल्या बागांमध्ये डाऊनी, भुरी रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र शेतकºयांनी दिवसरात्र एक करून बागा रोगांपासून वाचवल्या आहेत. अवकाळी पावसामुळे द्राक्षाच्या एकरी उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र द्राक्षांचे बाजारही तेजीत असल्याने आता अवकाळीचा फेरा नको अशी प्रार्थना शेतकरी करीत आहे.गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील माल आखाती देशात दरवर्षी निर्यात होत असतो. या भागातील काझड, लासुर्णे, बिरंगुडी, कळस आदी गावांतील शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेत असतो.नारायणगाव जम्बो, नानासाहेब पर्पल, माणिक चमन, एसएस, आरके, शरद सिडलेस या जातींच्या द्राक्षांना आखाती देशात मोठी मागणी असते. सध्या ‘शरद सिडलेस’ या जातीच्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो १०० ते ११० रुपये दर मिळत आहे. तर नारायणगाव जम्बो जातीच्या द्राक्षांना प्रतिकिलो १३० ते १३५ रुपयांपर्यंत निर्यातदार दर देत आहेत.बाजारात द्राक्षाचे दरचढे आहेत. त्यामुळे आता अवकाळीचा फेरा नको,अशी प्रार्थना शेतकरी करीतोयमाझ्या बागेची उशिरा छाटणी केली आहे, अवकाळी पावसामुळेधास्ती होती. मात्र नियमित फवारण्या व योग्य काळजी घेतल्याने आता बागेमध्ये रोग दिसत नाही. द्राक्षाचा बाजार असाच तेजीत राहिल्यास शेतकºयांच्या मेहनतीचे चिज होणार आहे.- दादासाहेब सांगळेद्राक्ष उत्पादक शेतकरी,बिरंगुडी-कळस

टॅग्स :Farmerशेतकरी