शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

तब्बल चार लाख अर्जदारांपैकी दाेन लाख कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र

By नितीन चौधरी | Updated: December 12, 2024 16:16 IST

राज्यसरकारचे वाचले ७० काेटी; बीड जिल्ह्याचा अहवाल अद्याप अप्राप्त

पुणे : नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जांद्वारे कांद्याचा विमा काढला होता. त्यापैकी तब्बल पावणे दोन लाख अर्ज कृषी विभागाच्या पडताळणीत अपात्र ठरले आहेत. यातून तब्बल ९६ हजार हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा बनावट असल्याचे आढळले आहे.बनावट अर्ज अपात्र ठरविल्याने राज्य सरकारचे तब्बल ७० कोटी रुपये वाचले आहेत. राज्यातील आठ जिल्ह्यांपैकी अद्याप बीड जिल्ह्याचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याने बनावट अर्जांची संख्या दोन लाखांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला.कृषी विभागाच्या नजर अंदाजित क्षेत्रानुसार राज्यात यंदा आठ जिल्ह्यांमध्ये ७५ हजार ७९३ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली होती. कृषी आयुक्तालयाने राज्यातील नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, संभाजीनगर व बीड या आठ जिल्ह्यांमध्ये बनावट पीक विमा उतरवल्याचा संशय आल्यानंतर १० पथकांनी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली. या आठ जिल्ह्यांमध्ये ४ लाख २ हजार ३९८ अर्जदारांनी २ लाख ६४ हजार २४८ हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा काढला होता. त्यात सर्वाधिक १ लाख २३ हजार ९५३ अर्जधारकांनी ८५ हजार ६६५ हेक्टर विमा एकट्या सोलापूर जिल्ह्यात काढण्यात आला होता. तर नाशिक जिल्ह्यात ८१ हजार ६२३ अर्जदारांनी ४८ हजार ३९४ हेक्टरवरील कांदा पीक विमा काढला होता.जवळपास ८४ हजार जणांच्या शेतातच नाही कांदापीककृषी विभागाने केलेल्या पडताळणीत तब्बल १ लाख ७४ हजार ९७२ अर्ज अपात्र ठरले असून या अर्जदारांनी ९५ हजार ७६५ हेक्टरवरील कांदा पिकाचा बनावट विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ८३ हजार ९११ अर्जांमध्ये कांदा पीकच नसल्याचे आढळले आहे. तर ६० हजार २५८ ठिकाणी लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा काढला आहे. एकाच क्षेत्रावर दोनपेक्षा अधिक वेळा विमा घेतलेल्या अर्जांची संख्या ७४ असून तब्बल ३० हजार ६७४ शेतकऱ्यांनी या पडताळणीला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पडताळणी केल्याने राज्य सरकारचे विमा हप्त्यापोटी देण्यात येणारे ७० कोटी रुपये वाचले आहेत.

बीड जिल्ह्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अपात्र अर्जांची संख्या एकूण अर्जांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे.- विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडonionकांदाMarketबाजार