शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
12
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
13
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
14
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
15
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

...अन्यथा काँग्रेसेची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल - केंद्रीय मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 15:31 IST

भारतासह जगभरातील अनेक देशांमधील महिला विविध क्षेत्रात काम करत असून स्वत:वर होणा-या अन्याय अत्याचारा विरोधातही आवज उठवत आहेत.

पुणे:  भारतासह जगभरातील अनेक देशांमधील महिला विविध क्षेत्रात काम करत असून स्वत:वर होणा-या अन्याय अत्याचारा विरोधातही आवज उठवत आहेत. भारतातील महिलांना होणारा त्रास संपविण्यासाठीच केंद्र सरकारने ट्रीपल तलाक विधेयक आणले. त्यामुळे काँग्रेस पक्षाने लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही या कायद्याला समर्थन द्यावे, अन्यथा त्यांची दुटप्पी भूमिका जनतेसमोर समोर येईल,असे वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी रविवारी केले.

केंद्रीय अर्थसंकल्पात लघु व मध्यम उद्योगांसाठी देण्यात आलेल्या गुंतवणूकीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी या प्रसंगी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे,अमर साबळे,खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.

ट्रीपल तलाकच्या मुद्यावरून सरकार धर्मात लुडबुड करीत आहे. कुराणाने तीन तलाक सांगितले असून एका धर्माच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,असे वक्तव्य माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी औरंगाबादच्या हल्लाबोल मोर्चामध्ये केले होते. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा गिरिराज सिंग यांनी तिव्रविरोध केला.मात्र,शरद पवार हे देशाचे एक ज्येष्ठ नेते असून मला त्यांच्याबद्दल मला आदर आहे,असे नमूद करून गिरिराज सिंग म्हणाले, जगभरातील 22 मुस्लिम देशानी ट्रीपल तलाक कायदा संपुष्टात आणला आहे. त्या देशातही शरियत होते.आपल्या देशात ट्रीपल तलाकला सर्वाधिक विरोध करणारे राजकीय पक्षच आहे. खरतर मतदानाचे राजकारण करणारेच ट्रीपल तलाकच्या विरोधात असून त्याला शरियतशी जोडत आहेत. परंतु, महिलांना त्रास द्यावा,असे शरियतमध्ये कुठेही लिहून ठेवलेले नाही.

दरम्यान, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योगाच्या बजेटमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 59 टक्के वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे लघु व मध्यम उद्योगांना अधिक चालना मिळणार असून कोट्यावधी हातांना रोजगार मिळणार आहे.केंद्र शासनातर्फे लवकरच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एका गावात ‘सोलर चरखा’ योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वत:च्या गावात 6 ते 10 हजार रुपयांचा रोजगार उपलब्ध होणार आहे.तसेच अधिकाधिक नव उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळणार आहे, असेही गिरिराज सिंग यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाtriple talaqतिहेरी तलाक