शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

देशात जैव शेतीचे प्राबल्य वाढेल : बुधाजीराव मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 11:23 IST

आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील.

ठळक मुद्देशेतीत तंत्रज्ञानाच्या वापरात होणार वाढ स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे सेंद्रीय पदार्थांच्या मागणीत येत्या काळात वाढ होणार

पुणे : शेतकरी आत्महत्या...शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव...जल प्रदुषण आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे विषयुक्त झालेला शेतमाल...असे सध्याच्या शेतीचे वर्णन करता येईल. मात्र, आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील. त्यामुळे भविष्यात जैव शेतीला मागणी वाढणार असून, अनेक बड्या कंपन्यादेखील यात रस घेतील, असे भाकीत प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. दहा वर्षांनतर देशातील शेती कशी असेल, याचा अंदाज डॉ. मुळीक यांनी लोकमतकडे व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. त्यात १९५०च्या दशकातील धान्य उत्पादनाच्या समस्ये पासून, नंतरच्या प्रत्येक दशकात शेतीत बदल होत गेले. यांत्रिकीकरण, हरितक्रांती, धवलक्रांती, मत्स्य शेतीची नील क्रांती, फळे आणि फुलांची रेनबो क्रांती आणि जैव तंत्रज्ञानाची ओळख, हे टप्पे आहेत. सध्या शेतकरी शेतमालाला भाव मिळत नसल्याने चिंताक्रांत आहेत. जलप्रदूषण आणि रासायनिक खतांच्या अपरिमित वापरामुळे शेतमाल विषयुक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या आहेत. ग्राहकच आता सेंद्रीय पदार्थांची मागणी करताना दिसत आहेत. येत्या काळात या मागणीत वाढच होत जाणार आहे. येणारा काळ हा जैविक शेतीचा असेल. या शेतीमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर होईल. खते, बियाणे याची मागणी ऑनलाईन होईल. उलट, अनेक कंपन्या शेतकऱ्यांना बांधावरच हव्या त्या वस्तू देतील. अभियांत्रिकी, वैद्यक आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या वाढीला एक मर्यादा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्ती हा डॉक्टर असला काय अथवा कामगार असला काय त्याला रोजचा आहार हवाच आहे. अर्थातच तो सकस आहारालाच प्राधान्य देईल. बदलत्या काळामधे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीवरील मनुष्यबळ काहीसे कमी होईल. मात्र, इतर विभागांच्या तुलनेत ते काहीसे अधिक राहील. येत्या काळात शिक्षित तरुण देखील शेतीकडे वळतील. त्यात नवा बदल करु पाहतील. त्या जोडीला बाजार देखील आॅनलाईन झालेले असतील. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरच शेतीचे दर, मालाची उत्पादकता, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव याची माहिती मिळेल. शेतीमधे देखील माहिती आणि तंत्रज्ञान असेल. त्या आधारावर तयार होणाऱ्या नवीन क्षेत्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करताना दिसतील. महत्त्वाचे म्हणजे शहरातील पाणी प्रक्रियाकडून नदीत सोडण्याला सरकार प्राधान्य देईल. थोडक्यात,शेतकºयांचे भविष्य उज्जवल असेल. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरी