शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

देशात जैव शेतीचे प्राबल्य वाढेल : बुधाजीराव मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 11:23 IST

आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील.

ठळक मुद्देशेतीत तंत्रज्ञानाच्या वापरात होणार वाढ स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे सेंद्रीय पदार्थांच्या मागणीत येत्या काळात वाढ होणार

पुणे : शेतकरी आत्महत्या...शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव...जल प्रदुषण आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे विषयुक्त झालेला शेतमाल...असे सध्याच्या शेतीचे वर्णन करता येईल. मात्र, आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील. त्यामुळे भविष्यात जैव शेतीला मागणी वाढणार असून, अनेक बड्या कंपन्यादेखील यात रस घेतील, असे भाकीत प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. दहा वर्षांनतर देशातील शेती कशी असेल, याचा अंदाज डॉ. मुळीक यांनी लोकमतकडे व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. त्यात १९५०च्या दशकातील धान्य उत्पादनाच्या समस्ये पासून, नंतरच्या प्रत्येक दशकात शेतीत बदल होत गेले. यांत्रिकीकरण, हरितक्रांती, धवलक्रांती, मत्स्य शेतीची नील क्रांती, फळे आणि फुलांची रेनबो क्रांती आणि जैव तंत्रज्ञानाची ओळख, हे टप्पे आहेत. सध्या शेतकरी शेतमालाला भाव मिळत नसल्याने चिंताक्रांत आहेत. जलप्रदूषण आणि रासायनिक खतांच्या अपरिमित वापरामुळे शेतमाल विषयुक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या आहेत. ग्राहकच आता सेंद्रीय पदार्थांची मागणी करताना दिसत आहेत. येत्या काळात या मागणीत वाढच होत जाणार आहे. येणारा काळ हा जैविक शेतीचा असेल. या शेतीमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर होईल. खते, बियाणे याची मागणी ऑनलाईन होईल. उलट, अनेक कंपन्या शेतकऱ्यांना बांधावरच हव्या त्या वस्तू देतील. अभियांत्रिकी, वैद्यक आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या वाढीला एक मर्यादा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्ती हा डॉक्टर असला काय अथवा कामगार असला काय त्याला रोजचा आहार हवाच आहे. अर्थातच तो सकस आहारालाच प्राधान्य देईल. बदलत्या काळामधे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीवरील मनुष्यबळ काहीसे कमी होईल. मात्र, इतर विभागांच्या तुलनेत ते काहीसे अधिक राहील. येत्या काळात शिक्षित तरुण देखील शेतीकडे वळतील. त्यात नवा बदल करु पाहतील. त्या जोडीला बाजार देखील आॅनलाईन झालेले असतील. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरच शेतीचे दर, मालाची उत्पादकता, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव याची माहिती मिळेल. शेतीमधे देखील माहिती आणि तंत्रज्ञान असेल. त्या आधारावर तयार होणाऱ्या नवीन क्षेत्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करताना दिसतील. महत्त्वाचे म्हणजे शहरातील पाणी प्रक्रियाकडून नदीत सोडण्याला सरकार प्राधान्य देईल. थोडक्यात,शेतकºयांचे भविष्य उज्जवल असेल. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरी