शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

"विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अजित पवारांच्या वक्तव्याने शंभूभक्तांच्या भावना दुखावल्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 15:44 IST

संभाजी महाराजांनी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले. परंतु धर्म बदलला नाही. राजकारण्यांनी याचा विचार करावा

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे तमाम शंभूभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होतेच .परंतु ते धर्मवीरही होते. याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. संभाजी महाराज यांनी स्वत: हिंदू धर्म सोडावा, यासाठी औरगजेबाने जंग जंग पछाडले. मात्र, महाराजांनी जीवाची पर्वा न करता बलिदान दिले. परंतु धर्म बदलला नाही. राजकारण्यांनी याचा विचार करावा, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी लगावला.

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या दरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे, तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला. त्यामुळे पवार यांचा निषेध करण्यासाठी भाजपने सहयोग सोसायटी नंतर भिगवण चौकात नगरपरिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जालिंदर कामठे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, गजानन वाकसे, रंजनकुमार तावरे, सुरेंद्र जेवरे, पांडूरंग कचरे, अविनाश मोटे, सतीश फाळके आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

 विरोधी पक्षनेते पवार यांनी या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. पुणे महानगरपालीकेचे महापौर मोहोळ म्हणाले, ४० दिवस औरंजेबाच्या ताब्यात असताना धर्म बदलण्यासाठी महाराजांचे हाल करण्यात आले. परंतु धर्माशी बांधिलकी असलेल्या महाराजांना प्राणाची आहुती दिली, परंतु शरण गेले नाहीत. मग ते धर्मवीर कसे नव्हते हे अजित पवार यांनी सांगावे. जगदगुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा त्यांचे मुलगा नारायण महाराज यांनी सुरु केला. परंतु मुघलांनी हा सोहळा होवू नये, यासाठी वारकºयांवर आक्रमण केले. हा सोहळा सुरु राहावा यासाठी नारायण महाराज शंभूराजेंकडे गेले. त्यांनी पालखी सोहळा व्हावा यासाठी त्यांचे सहकार्य घेतले. हे धर्म कार्यच होते. हा इतिहास आहे. पवार यांनी  तात्काळ माफी मागावी अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पवार यांच्या पुतळ्याचे दहन करू,असा इशारा यावेळी देण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण