शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

Operation Sindoor: भारताला नष्ट करण्याचे पाकिस्तानचे उद्दिष्ट - कर्नल अनिल आठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:30 IST

पाकिस्तानला केवळ काश्मीर ताब्यात घ्यायचे नसून, भारताला नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कर्नल अनिल आठले यांनी व्यक्त केले.

पुणे :  गेल्या ७५ वर्षांपासून भारत पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पाकिस्तानने कायम दहशतवादाला खतपाणी घातले आहे. पाकिस्तान आजही भारताला अणवस्त्रांची धमकी देत आहे. त्यांच्याकडून भारतीय सीमेवर हल्ले, छोट्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे पाकिस्तानला केवळ काश्मीर ताब्यात घ्यायचे नसून, भारताला नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कर्नल अनिल आठले यांनी व्यक्त केले.वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित "वसंत व्याख्यानमाले'च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील सदा डुंबरे स्मृती व्याख्यानात पाकिस्तानबरोबर सर्वांगीण युद्धाला पर्याय काय? या विषयावर आठले बोलत होते. आठले म्हणाले, भारत हा कायम अहिंसा पाळणारा देश आहे. आपण बुद्धांच्या भूमीत राहतो. त्यांची तत्त्वे व निष्ठा देशाप्रती प्रामाणिकपणा आपल्यात आहे. मात्र, पाकिस्तान हा दुटप्पी भूमिका घेणारा आहे. केवळ हिंदू-मुस्लीम करून आंतकी हल्ले करण्यातच तो धन्य समजतो. युद्धभूमीवर पाकिस्तानला अनेक वेळा भारताने धडा शिकविला आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानला चांगली चपराक बसली आहे. मात्र, पाकिस्तानात आजपर्यंत कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्याला प्रत्युत्तर देऊनच शांत करावे लागेल, असेही आठले यांनी नमूद केले.पोकळ धमकी देणे बंद करायला हवेपाकिस्तान हा अणवस्त्र व क्षेपणास्त्रांच्या जोरावर भारतासह इतर राष्ट्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ अणवस्त्र व क्षेपणास्त्र जवळ असून चालत नाही, तर त्यांची वहनक्षमता त्या देशात असणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत ही वहनक्षमता पाकिस्तानकडे उपलब्ध नाही. पाकिस्तानने अशी पोकळ धमकी देणे बंद करावे. यातच त्यांच्या राष्ट्राचे हित आहे, असे, आठले यावेळी म्हणाले.  

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर