शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

Operation Sindoor: भारताला नष्ट करण्याचे पाकिस्तानचे उद्दिष्ट - कर्नल अनिल आठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:30 IST

पाकिस्तानला केवळ काश्मीर ताब्यात घ्यायचे नसून, भारताला नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कर्नल अनिल आठले यांनी व्यक्त केले.

पुणे :  गेल्या ७५ वर्षांपासून भारत पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पाकिस्तानने कायम दहशतवादाला खतपाणी घातले आहे. पाकिस्तान आजही भारताला अणवस्त्रांची धमकी देत आहे. त्यांच्याकडून भारतीय सीमेवर हल्ले, छोट्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे पाकिस्तानला केवळ काश्मीर ताब्यात घ्यायचे नसून, भारताला नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कर्नल अनिल आठले यांनी व्यक्त केले.वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित "वसंत व्याख्यानमाले'च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील सदा डुंबरे स्मृती व्याख्यानात पाकिस्तानबरोबर सर्वांगीण युद्धाला पर्याय काय? या विषयावर आठले बोलत होते. आठले म्हणाले, भारत हा कायम अहिंसा पाळणारा देश आहे. आपण बुद्धांच्या भूमीत राहतो. त्यांची तत्त्वे व निष्ठा देशाप्रती प्रामाणिकपणा आपल्यात आहे. मात्र, पाकिस्तान हा दुटप्पी भूमिका घेणारा आहे. केवळ हिंदू-मुस्लीम करून आंतकी हल्ले करण्यातच तो धन्य समजतो. युद्धभूमीवर पाकिस्तानला अनेक वेळा भारताने धडा शिकविला आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानला चांगली चपराक बसली आहे. मात्र, पाकिस्तानात आजपर्यंत कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्याला प्रत्युत्तर देऊनच शांत करावे लागेल, असेही आठले यांनी नमूद केले.पोकळ धमकी देणे बंद करायला हवेपाकिस्तान हा अणवस्त्र व क्षेपणास्त्रांच्या जोरावर भारतासह इतर राष्ट्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ अणवस्त्र व क्षेपणास्त्र जवळ असून चालत नाही, तर त्यांची वहनक्षमता त्या देशात असणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत ही वहनक्षमता पाकिस्तानकडे उपलब्ध नाही. पाकिस्तानने अशी पोकळ धमकी देणे बंद करावे. यातच त्यांच्या राष्ट्राचे हित आहे, असे, आठले यावेळी म्हणाले.  

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर