शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

.... तरच ‘कौटुंबिक’लॉकडाऊन सुखाचा..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 21:55 IST

आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी..

आमच्या शेजारी राहणा-या आजी रात्री मला फोनवर सांगत होत्या कि, बघ ना,नातीने आत्ता रात्री आठ वाजता वॉशिंग मशीन लावलंय, आणि कानात इअरफोन अडकवून तो लॅपटॉप समोर घेऊन बसलीय.आता रात्री अपरात्री धुणं वाळत घालेल. काळ वेळेचं काही भान नाही. आजींचा त्रागा ऐकून मी म्हटले,आजी, तुम्ही दुर्लक्ष करा... ते एवढं सोप्प आहे?  आज ' लॉकडाऊन 'मुळे सध्या सगळी मंडळी घरीच आहेत.एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणं हे भाग्य असले तरी सदासर्वकाळ एकत्र राहाण्याने काही प्रश्न नक्कीच निर्माण झालेत. ताणाच्या या परिस्थितीत एकमेकांच्या उणिवा प्रकर्षांने समोर येत आहेत.या काळात आपल्या सगळ्यांनाच आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे आहे..आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी असे म्हणावेसे वाटते...  आज घरातल्या गृहिणीवर अतिरिक्त ताण आलाय. ती तिच्या ऑफिसचे काम घरुन करत असेल तर तिला दोन्ही आघाड्यांवर कार्यरत राहावे लागतयं. पण ती केवळ गृहिणी असेल तरी तिचे काम वाढलेले आहेच कारण कामवाल्या बायका आज मदतीला नाहीत. त्यामुळे घरात कामाच्या वाटणीला पर्याय नाही, हे सत्य आहे. प्रत्येकाने समजून उमजून आपली जबाबदारी ओळखून कामाचा वाटा उचलायला हवा.महत्वाचे हे की कामांची एकदा वाटणी झाली की परस्परांनी त्यात ढवळाढवळ करायची नाही. हे ठरवून टाका. नवरा,मुलं यांना कामं सोपवून दिली की ते त्यांच्या पध्दतीने करतील. फारतर एकदा आठवण करुन द्यायला हरकत नाही. पण ती कामं पूर्ण करायची त्यांची जबाबदारी हे एकदा ठरवून टाकायचे. घरात पसारा पडलाय.कोण येतयं आता घरी? म्हणून तिकडे कोणाचेच लक्ष नाही.आपण केवळ त्रागा करुन उपयोगी नाही. मुलांना चारवेळा पसारा आवरा सांगायचे, ती आपलं ऐकत नाहीत. चिडचिड करण्याखेरीज काहीच होत नाही. मग शेवटी आपणच उचलून ठेवतो. त्यापेक्षा आधीच उचलला असतां तर? चिडचिड त्रागा वाचला असता.वातावरण देखील डिस्टर्ब झालं नसतं. हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही हे मला मान्य आहे.

पण आत्ता या दिवसात आपल्याला मानसिक शांतता हवी आहे. त्यासाठी हा एक लहानसा प्रयत्न आहे. कारण आत्ता घरात नसते वादविवाद नको आहेत. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे काही दिवस थोडे फार दुर्लक्ष करायला काय हरकत आहे? भांडी अगदी लखलखीत स्वच्छ नाही निघाली, धुणं नीट न झटकता वाळत घातले गेले? तर फारसं काही बिघडत नाही. त्यामुळे तिकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे केव्हाही श्रेयस्कर.दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असण्याचा. हातात वेळ आहे दुसरं काही काम नाही म्हणून सतत कोणता ना कोणता तरी स्क्रिन डोळ्यांसमोर असणं हे तितकेसे बरं नाही. घरातल्या मंडळींशी गप्पा टप्पा न मारता केवळ आभासी जगात रमणं तितकेसे बरोबर नाही. दिवसातला काही ठराविक काळ तरी एकत्र घालवा. चहा,नाष्टा,जेवण,चॅनल्स वरील एखादी मालिका सगळ्यांनी मिळून पहा. त्यांवर चर्चा करा.या सगळ्या बरोबर अजून एक महत्त्वाचे ते म्हणजे स्वताचा स्वताशी संवाद असणं आवश्यक. आपल्याला आवडेल ती गोष्ट मग ते वाचन असो की शिवणकाम, लिखाण यांसह काहीही असो,आपल्या आवडीचे काहीही आवर्जून करणे व त्यासाठी वेळ देणे महत्वाचे. हाताशी वेळ आहे तर नवनवीन गोष्टी करुन बघतां येतील. जुन्या काही गोष्टी आठवून बघा. पूर्वी कामाच्या व्यापात, संसाराची जबाबदारी निभावताना जे काही आवडीचे करायचे राहून गेले आहे ते पुन्हा सुरु करता येईल.त्या निमित्ताने आपली बकेट लिस्ट पुन्हा एकदा नव्याने तयार करता येईल. स्वत:ची आवड, एकटेपणा जपायला हवा. तरच हे दिवस आनंदाचे, शांततेचे जातील. आणि पर्यायाने पुढीलकाळात देखील कौटुंबिक स्वास्थ जपले जाईल.

- अ‍ॅड. भाग्यश्री चौथाई 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यMeditationसाधना