शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

Maratha Reservation: केवळ मराठा समाजाचे होणार सर्वेक्षण; आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्रामांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 11:50 IST

ओबीसीतील अन्य जातींचे सर्वेक्षण केले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले....

पुणे : राज्य सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य मागासवर्ग आयोगाला दिले होते. त्यानुसार केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी स्पष्टोक्ती आयोगाचे सदस्य व निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी दिली. आयोगाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत काही सदस्यांनी सर्वच जातींचे सर्वेक्षण करावे याबाबत चर्चा केली होती. मात्र, चर्चा करणे म्हणजे मागणी होत नाही आणि राज्य सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर आयोगाच्या काही सदस्यांनी राज्यातील सर्वच जातींचे आर्थिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासले जाईल, यासाठी येथे आठवडाभरामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात होईल व पुढील तीन महिन्यांमध्ये हे सर्व पूर्ण होईल, अशी माहिती दिली होती. त्यानंतर शुक्रवारी आयोगाचे सदस्य असलेले चंद्रलाल मेश्राम यांनी हा मुद्दा खोडून काढला. ते म्हणाले की, आयोगाच्या बैठकीत काही सदस्यांनी सर्वच जातींचे सर्वेक्षण करावे याबाबत चर्चा केली. मात्र, चर्चा म्हणजे मागणी होत नाही. आयोगाने तसा ठराव पारित केल्यावर मात्र तसे सर्वेक्षण केले जाऊ शकते. त्यासाठी राज्य सरकारचीदेखील परवानगी आवश्यक आहे. राज्य सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव नसल्याने सर्वच जातींचे सर्वेक्षण होणार नाही.

राज्य सरकारने केवळ मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे आयोगाला सांगितले आहे. राज्य सरकारने दिलेल्या टर्म ऑफ रेफरन्सनुसारच हे सर्वेक्षण केवळ मराठा समाजाचे केले जाणार आहे. मराठा समाजातदेखील सात जाती आहेत. त्यातील काही जाती ओबीसींमध्ये समाविष्ट आहेत. जातींचा समूह तयार होतो. त्यामुळे मराठा समाजातील या जातींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ओबीसीतील अन्य जातींचे सर्वेक्षण केले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

संवैधानिक तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी ओबीसी जातींचे पुनर्निरीक्षण करण्याचा कायदा आहे. त्यासाठी राज्य सरकारची कलम ११ नुसार परवानगी आवश्यक असते. घटनात्मक तरतुदीनुसार आयोगाने ओबीसींच्या पुनर्निरीक्षणाच्या सर्वेक्षणाबाबत राज्य सरकारला एक वर्षापूर्वीच प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, राज्य सरकारने त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही मेश्राम यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्वेक्षण करण्यासाठी आयोगाला निधीची तसेच सरकारी व्यवस्थेची आवश्यकता असते. त्यानुसारच हे सर्वेक्षण केले जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा