शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

धरणात केवळ १२ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:23 AM

पुणे जिल्ह्यातील सिंचनाला आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे.

पुणे : जिल्ह्यातील धरणांची पाणी पातळी खालवली असून पुणे महापालिकेला व परिसरातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षापेक्षा धरणात ४.४५ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. जिल्ह्यातील बहुतांश धरणे केवळ ३५ ते ५० टक्के भरलेली आहेत.

पुणे जिल्ह्यातील सिंचनाला आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाºया धरणांमधील पाणीसाठ्यात चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. धरणातील पाणीसाठा कमी असल्याने सिंचनाऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच खडकवासला धरणातून दौंड, इंदापूरसाठी सोडले जाणारे उन्हाळी आवर्तन यंदा सोडले जाणार नाही, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. खडकवासला धरण प्रकल्पात मागील वर्षापेक्षा यंदा चार टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा कमी असला तरी शेतीसाठीचे उन्हाळी आवर्तन रद्द केल्यामुळे पुणे महापालिका व परिसरातील गावांना आवश्यक असणारे पाणी पुरणार आहे.

मात्र, ग्रामीण भागातून उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी दबाव निर्माण झाला तर पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. सध्या जिल्ह्यातील भामा आसखेड, आंद्रा, पवना, कासारसाई, खडकवासला आणि वीर या धरणांमध्येच ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. उर्वरित सर्व धरणातील पाणीसाठा सुमारे ३० ते ४० टक्क्यांच्या खाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच एकट्या पुणे जिल्ह्यात ६४ टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Waterपाणी