शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कांदा पुन्हा तेजीत; ओखी वादळामुळे नुकसान झाल्याने आवक घटून दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 15:56 IST

ओखी वादळामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम कांदा पुन्हा तेजीत आला असून, आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत.

ठळक मुद्देकिरकोळ बाजारात कांद्याची तब्बल ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने विक्री कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पुणे : ओखी वादळामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा परिणाम कांदा पुन्हा तेजीत आला असून, आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत.सध्या नवीन कांद्याचा हंगाम सुरु झाला आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात हंगाम सुरु होण्यास उशीर झाला आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अथवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गरवी कांद्याची आवक सुरु होईल़  हे पीक मात्र मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल़ तो पर्यंत बाजार तेजीतच राहतील असा अंदाज श्री छत्रपती आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी व्यक्त केला आहे़  दरम्यान जुन्या कांद्याचा हंगाम संपला आहे. मार्केट यार्डात दाखल होणारा कांदा हा पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून येत आहे़ रविवारी जुन्या कांद्याची अवघी ३ ते ४ ट्रक तर नवीन कांद्याची २०० ट्रक इतकी आवक झाली आहे़  घाऊक बाजारात नवीन कांद्यास २५० ते ३३० रुपये तर जुन्या कांद्यास ३५० ते ४५० रुपये प्रति दहा किलोस दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात कांद्याची तब्बल ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागत आहे.

टॅग्स :onionकांदाmarket yardमार्केट यार्डPuneपुणे