शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

निर्यातबंदीतही इंदापुरला कांद्याने मारली उसळी, मिळाला ४१०० रुपये क्विंटल उच्चांकी बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 13:03 IST

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर सर्वत्र टीका होत असून विविध ठिकाणी आंदोलने देखील होत आहे.

ठळक मुद्देनिर्यातबंदी असूनही कांदा दरात तेजी

इंदापूर (कळस):  देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेकांदा निर्यात करण्यास बंदी घातली. यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून सर्वच पक्षांनी आंदोलने सुरू केली. मात्र इंदापुर बाजार समितीच्या येथील बाजार आवारात निर्यात बंदी असतानाही सोमवारी (दि २१)  १९२ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल ४१०० रुपये, किमान ७०० रुपये प्रति क्टिंटल भाव मिळाला. सोमवारी प्रथमच  ४१०० क्विंटल रुपयांपर्यत उसळी मारुन उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कांदा दरात गेल्या काही दिवसांत भावात वाढ होत आहे. भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठया प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत. असे असले तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांदयाचे सडण्याचे प्रमाण वाढल्याने निम्मा कांदा फेकून देण्याची पाळी कांदा उत्पादकांवर आल्याने भाव वाढीने झालेल्या खर्चाचीच गोळाबेरीज होणार असल्याचे चित्र आहे. इंदापुर या ठिकाणी कांदा लिलाव वार सोमवार, बुधवार व शुक्रवारी होतो बाजार समितीमध्ये सोमवारी १९२ क्विंटल काद्यांची आवक झाली  कांद्याच्या दरात उसळी मारुन प्रति किलो ४१ दराने कांदा विक्री झाल्याने तेजी कायम राहणार असल्याचे चित्र आहे.  देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यास बंदी घातली.यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून अनेक पक्षांनी आंदोलने सुरू केली. लोकप्रतिनिधीनी यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करून निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करीत आहेत. बाजारात मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे.बाजार समितीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत आहे. निर्यातबंदी होण्यापूर्वी ३० रुपये भाव मिळत होता. निर्यातबंदीचा निर्णय झाला. त्यानंतर एक दोन दिवस भाव थोडा कमी झाला होता. निर्यातबंदीचे पुढे काय होते, याची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री कमी केली. त्यातच दक्षिण भारतातून कांद्याला मागणी वाढल्याने तेथील व्यापारी महाराष्ट्रात येऊन कांदा खरेदी करत आहेत. त्या भागात पाऊस झाल्याने तेथील लाल कांदा बाजारात उपलब्ध होत नसल्याने त्यांना महाराष्टातून कांदा न्यावा लागत आहे, यामुळे निर्यातबंदी असूनही कांदा दरात तेजी आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरonionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी