शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

साखर उताऱ्यात एक टक्का घट; सव्वा महिन्यात राज्यात १६ लाख टन साखर उत्पादन

By नितीन चौधरी | Updated: December 7, 2023 16:02 IST

गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

पुणे : राज्यात एक नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या साखर हंगामाला सव्वा महिन्यांचा काळ उलटला असून १८० कारखान्यांनी आतापर्यंत १६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा साखर उताऱ्यात सुमारे एक टक्क्याची घट झाली आहे. गाळपास ऊस कमी असल्याने हंगाम आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात एक नोव्हेंबरला ऊस गाळप सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, त्यानंतर दिवाळी आल्याने प्रत्यक्षात गाळपास उशिरा सुरुवात झाली. त्यातही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे साखर कारखाने सुरू होण्यास विलंब झाला. राज्यात सध्या ८८ सहकारी व ९२ खाजगी असे एकूण १८० साखर कारखाने ऊसगाळप करत आहेत. कोल्हापूर विभागामध्ये २१ सहकारी व ११ खासगी असे एकूण ३२ कारखाने तर पुणे विभागात १६ सहकारी व ११ खाजगी असे २७ कारखाने ऊसगाळप करत आहेत. सोलापूरमध्ये सहकारी १५ व खाजगी २९ असे ४४ कारखाने, नगर विभागात १४ सहकारी व १० खासगी असे २४, औरंगाबाद विभागामध्ये १३ सहकारी ९ खासगी असे ११, नांदेड विभागात ९ सहकारी व १९ खासगी असे २८ तर अमरावती दोन तर नागपुरात एक खासगी कारखाना गाळप हंगामात सहभागी झाला आहे.

आतापर्यंत २०२.४४ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १६.३५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. सर्वाधिक साखर उत्पादन पुणे जिल्ह्यात ३.९ लाख टन तर सोलापूर विभागात ३.०४ लाख टन उत्पादन झाले आहे. कोल्हापूर विभागात ३.२, नगर विभागात २.२ लाख टन उत्पादन झाले आहे. यंदाच्या उसगाळप हंगामात पहिल्या सव्वा महिन्यात आतापर्यंत केवळ ८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी हाच साखर उतारा ८.८७ टक्के इतका होता. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात ८.९५ टक्के मिळाला आहे. अमरावती विभागात केवळ दोन खासगी कारखाने सुरू असले तरी तेथे साखर उतारा ८.४९ टक्के आल्याचे साखर आयुक्तालयाकडून मिळालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात ८.३३, सोलापूर विभागात ७.३९ नगर विभागात ७.९६, नांदेड विभागात ८.१२, तर औरंगाबाद विभागात सर्वात कमी ६.८३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

पावसाने ओढ दिल्याने ऊस वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच साखर उतारा कमी मिळाल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. याचा परिणाम लागवडीवरदेखील झाला असून गाळप हंगाम यंदा आणखी दोन ते अडीच महिनेच सुरू राहील, अशी शक्यताही कारखानदार व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी याच काळात राज्यात १९२ साखर कारखाने सुरू होते. त्यातून २७८ लाख टन उसाचे गाळ होऊन २४ लाख टन साखर उत्पादित झाली होती.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसSocialसामाजिक