शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: संमेलनाध्यक्षांना मिळणारा एक लाखांचा निधी, डॉ. जयंत नारळीकर स्वीकारणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:03 IST

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना वाङ्मयीन कार्यासाठी एक लक्ष रुपयांचा निधी देण्यात ...

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना वाङ्मयीन कार्यासाठी एक लक्ष रुपयांचा निधी देण्यात येतो. पण, नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हा निधी स्वीकरणार नसून, महाराष्ट्र साहित्य परिषदेलाच हा निधी देणार आहेत.

"२०१० साली पुण्यात डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आयोजक संस्था असलेल्या पुण्यभूषण फाउंडेशनने ८२ लक्ष रुपयांची देणगी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिली. त्या देणगीच्या व्याजातून इतर साहित्यिक उपक्रमांबरोबर प्रतिवर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी दिला जातो. संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील अनेक साहित्य संस्था आणि ग्रंथालये कार्यक्रमासाठी निमंत्रित करीत असतात. अनेक साहित्य संस्था व ग्रंथालये यांना अध्यक्षांच्या प्रवास, निवासाची व्यवस्था करताना निधीअभावी अडचणी येत असतात. अशावेळी या निधीचा उपयोग संमेलनाध्यक्षांनी केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. तसेच संमेलनाध्यक्षांना काही वाङ्मयीन उपक्रम घ्यायचे असल्यासही या निधीचा उपयोग करता येतो. प्रतिवर्षी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी साहित्य संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येतो.

नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मंगला नारळीकर यांच्याशी या निधी संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हा निधी न स्वीकारता महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJayant Narlikarजयंत नारळीकरSocialसामाजिकMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन