शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: संमेलनाध्यक्षांना मिळणारा एक लाखांचा निधी, डॉ. जयंत नारळीकर स्वीकारणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 11:03 IST

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना वाङ्मयीन कार्यासाठी एक लक्ष रुपयांचा निधी देण्यात ...

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना वाङ्मयीन कार्यासाठी एक लक्ष रुपयांचा निधी देण्यात येतो. पण, नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर हा निधी स्वीकरणार नसून, महाराष्ट्र साहित्य परिषदेलाच हा निधी देणार आहेत.

"२०१० साली पुण्यात डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आयोजक संस्था असलेल्या पुण्यभूषण फाउंडेशनने ८२ लक्ष रुपयांची देणगी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिली. त्या देणगीच्या व्याजातून इतर साहित्यिक उपक्रमांबरोबर प्रतिवर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयांचा निधी दिला जातो. संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्रातील आणि बृहन्महाराष्ट्रातील अनेक साहित्य संस्था आणि ग्रंथालये कार्यक्रमासाठी निमंत्रित करीत असतात. अनेक साहित्य संस्था व ग्रंथालये यांना अध्यक्षांच्या प्रवास, निवासाची व्यवस्था करताना निधीअभावी अडचणी येत असतात. अशावेळी या निधीचा उपयोग संमेलनाध्यक्षांनी केल्यास अडचणी दूर होऊ शकतात. तसेच संमेलनाध्यक्षांना काही वाङ्मयीन उपक्रम घ्यायचे असल्यासही या निधीचा उपयोग करता येतो. प्रतिवर्षी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी साहित्य संमेलनाध्यक्षांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येतो.

नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डॉ. जयंत नारळीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मंगला नारळीकर यांच्याशी या निधी संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हा निधी न स्वीकारता महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेJayant Narlikarजयंत नारळीकरSocialसामाजिकMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन