शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पहिल्या शेतकरी आत्महत्येला झाली ३२ वर्षे ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एकदिवसीय अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:50 IST

देशातील पहिल्या शेतकरी अात्महत्येला 32 वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने अात्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच अात्महत्या करु नका, व्यवस्थेविरुद्ध लढा हा संदेश देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग अांदाेलन करण्यात अाले.

ठळक मुद्देदेशातल्या पहिल्या शेतकरी अात्महत्येला झाली 32 वर्षेकर्जमुक्ती अाणि दीडपट हमीभावाची अांदाेलनकर्त्यांची मागणी

पुणे : यवतमाळ येथील चिलगव्हाण या गावातील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह १९८६ रोजी सरकारच्या चुकीच्या धोरणांना कंटाळून आत्महत्या केली होती. ही देशातील नोंद झालेली पहिली शेतकरी आत्महत्या होती. या घटनेला ३२ वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्या कुटुंबाला अभिवादन करण्यासाठी तसेच सध्याच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, पिकाला दीडपट हमीभाव द्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.     शहरातील झाशीची राणी चौक या ठिकाणी हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याच्या कानाकाेपऱ्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या असंख्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.     यावेळी बोलताना तुपकर म्हणाले, साहेबराव करपे व देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच इतर शेतकऱ्यांना हिम्मत देण्यासाठी, आत्महत्या करु नका हे सांगण्यासाठी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करत आहोत.  सरकारने स्वामिनाथन आयोगातील दीडपट हमीभावाची शिफारस लागू करावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी अशी मामची मागणी आहे. 

टॅग्स :PuneपुणेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाStudentविद्यार्थी