शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

"कर दिला तरच ग्रामसभेत बोलता येणार"; बारामतीतील शिरवली ग्रामपंचायतीचा अजब फतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 15:54 IST

पाणीपट्टी व घरपट्टी भरलेल्या ग्रामस्थांनाच ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार....

सांगवी (बारामती ) :बारामती तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीने अजब फतवा काढल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उद्या 26 जानेवारीच्या ग्रामसभेला पाणीपट्टी व घरपट्टी भरलेल्या ग्रामस्थांनाच ग्रामसभेत बोलण्याचा अधिकार दिला जाईल, अशा आशयाचा बोर्ड ग्रामपंचायतीसमोर लावण्यात आल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.  

ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कर भरलेल्या पावत्या असल्याशिवाय ग्रामसभेला उपस्थित राहू देणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेत प्रत्येक नागरिकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्याला कोणीही बंधन घालू शकत नाही. ग्रामपंचायतीच्या या अजब फतव्यामुळे मात्र, काही ग्रामस्थांनी देखील कर भरलेल्या पावत्या घेऊन उद्या ग्रामसभेत बोलण्याची तयारी केली आहे. तर या निर्णयामुळे उद्याच्या ग्रामसभेवर बहिष्कार घालणार असल्याचे देखील ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामसभा हे गावाचा परिपूर्ण विकास साधण्यासाठी ग्रामस्थांच्या हातात असणारे प्रभावी साधन आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेला उपस्थित राहून कामकाज व विविध योजना समजून घेतल्या तर गावाचा विकास खूप गतीने होईल. उपेक्षित व वंचितांना सर्व शासकीय योजनांचा लाभ कसा मिळवून देता येतो.  राज्यघटनेने पंचायत राज व्यवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. गाव पातळीवर काम करणारी व लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांमार्फत चालवली जाणारी ग्रामपंचायत ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. मात्र सरपंच कार्यकारणीने घेतलेल्या या निर्णयाला ग्रामस्थांनी सोशल मीडियातून चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामती