शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

स.प.महाविद्यालयाला एनएसएसचा राज्यस्तरीय पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 7:53 PM

राज्य शासनातर्फे 1993-94 वषार्पासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार दिले जातात.

ठळक मुद्दे विलास उगले यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्याचा पुरस्कार

पुणे: राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे 2018-19 या शैक्षणिक वषार्तील राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदाचा राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयास मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार स.प.महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास उगले यांना जाहीर झाला आहे.राज्य शासनातर्फे 1993-94 वषार्पासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार दिले जातात. शासनाने 2018-19 या शैक्षणिक वषार्तील पुरस्कारासाठी विद्यापीठाकडून प्रस्ताव मागविले होते.उच्च व तंत्र शिक्षण विभागाने प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार अध्यादेशाद्वारे जाहीर केले आहेत.त्यात सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला मिळला असून याच विद्यापीठाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.त्र्यंबक पाटील यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिका-याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.स्मृतिचिन्ह व दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पदाचा पुरस्कार स.प.महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास उगले यांच्यासह धुळ्याच्या डॉ.दत्ता ढाले यांना मुंबईच्या रवी चेट्टीयार यांना तर गडचिरोलीच्या प्रदिप चापले यांना जाहीर झाला आहे.

तसेच कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कारासाठी धायरी येथील धायरेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संस्थेच्या कै.बंडोजी खंडोजी चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मदन सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार पुण्यातील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सत्यम देवकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सासवड येथील वाघीरे महाविद्यालयाच्या देवानंद भालेराव,महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील आकाश देशमुख आणि धायरीतील बंडोजी खंडोजी विद्यालयाच्या आदित्य दारवटकर यांना जाहीर झाला आहे.-----------राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाला व महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिका-यांना पुरस्कार मिळाला याचा मनापासून आनंद होत आहे. देश सेवेचे व्रत घेवून काम करणा-या संस्थेला व व्यक्तीला त्याच्या कामाची पोच पावती मिळते. यंदा महाविद्यालयाचे एनएसएसचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून दोन्ही पुरस्कार मिळणे ही अभिमानाची बाब आहे. शि.प्र.मंडळीकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे हे यश मिळाले.- डॉ.दिलीप शेठ,प्राचार्य,स.प.महाविद्यालय,पुणे 

टॅग्स :Puneपुणेcollegeमहाविद्यालयGovernmentसरकार