शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

एनपीआर हे एनआरसीचेच पहिले पाऊल : सचिन पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 13:19 IST

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते सचिन पायलय यांनी एनआरसीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

पुणे : सरकारकडून नॅशनल पब्लिक रेकाॅर्ट (एनपीआर) लागू केले जात आहे. परंतु एनपीआर हे राष्ट्रीय नागरिकता संशाेधन(एनआरसी) चे पहिले पाऊल असल्याची टीका राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर केली. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित हाेते. आम्ही आणलेले एनपीआर आणि आत्ताचे सरकार आणत असलेल्या एनपीआरमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पायलट यांनी पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारवर जाेरदार टीका केली. महागाई, बेराेजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यावरुन देशाचे लक्ष हटविण्यासाठी सीएए, एनआरसी सारखे कायदे आणले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच धर्माच्या आधारावर नागरिकता देणे चुकीचे असून ते संविधानाच्या कलम 14 च्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकारवर टीका करताना पायलट म्हणाले, केंद्र सरकारने देशभरात गाेंधळ निर्माण केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) हे कुठल्या हेतूने लागू करण्यात आले हे तपासणे आवश्यक आहे. आसममध्ये पुन्हा एनआरसी लागू करण्याचा विचार केला जात आहे. आसाममध्ये आधी करण्यात आलेल्या एनआरसीमध्ये बाहेर पडलेले 14 ते 15 लाख नागरिक हे हिंदू आहेत. जे गरीब, आदिवासी, दलित, मागासवर्गीय लाेक आहेत. ते यात भरडले जात आहेत. एकीकडे देशात शेतकरी आत्महत्या करत असताना, आर्थिक मंदीला देश सामाेरा जात असताना या विषयांवरुन देशाचे लक्ष हटविण्यासाठी हे कायदे सरकारकडून आणले जात आहेत. 

देशाची नागरिकता धर्माच्या आधारावर देणे चुकीचे आहे. ज्याला नागरिकत्व हवे आहे त्याला देण्यास हरकत नाही. परंतु त्या व्यक्तीमुळे जर देशाला धाेका निर्माण हाेणार असेल तर त्या व्यक्तीला कधीच नागरिकत्व देऊ नये. परंतु विशिष्ट धर्माच्या आधारावर नागरिकत्व नाकारणे चुकीचे आहे. हे संविधानाच्या कलम 14 च्या विराेधात आहे. या नवीन कायद्यांचा भाजपसाेबत असणारे पक्ष सुद्धा विराेध करत आहेत. सरकारने या कायद्यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. 

काेणी राजकारणासाठी देशाला ताेडायचा प्रयत्न केला तरी हा देश एकसंध राहील. या देशाचा प्रत्येक नागरिक या भारतमातेचा सुपूत्र आहे. जे देश धर्माच्या आधारावर निर्माण झाले आहेत, त्यांची अवस्था आपल्या सगळ्यांसमाेर आहे. हा देश नेहमीच एकजूट राहील असेही पायलय यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी