शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

एनपीआर हे एनआरसीचेच पहिले पाऊल : सचिन पायलट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 13:19 IST

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काॅंग्रेसचे नेते सचिन पायलय यांनी एनआरसीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

पुणे : सरकारकडून नॅशनल पब्लिक रेकाॅर्ट (एनपीआर) लागू केले जात आहे. परंतु एनपीआर हे राष्ट्रीय नागरिकता संशाेधन(एनआरसी) चे पहिले पाऊल असल्याची टीका राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर केली. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित हाेते. आम्ही आणलेले एनपीआर आणि आत्ताचे सरकार आणत असलेल्या एनपीआरमध्ये जमीन आसमानचा फरक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पायलट यांनी पत्रकार परिषदेमध्ये केंद्र सरकारवर जाेरदार टीका केली. महागाई, बेराेजगारी, ढासळती अर्थव्यवस्था यावरुन देशाचे लक्ष हटविण्यासाठी सीएए, एनआरसी सारखे कायदे आणले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच धर्माच्या आधारावर नागरिकता देणे चुकीचे असून ते संविधानाच्या कलम 14 च्या विराेधात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 

केंद्र सरकारवर टीका करताना पायलट म्हणाले, केंद्र सरकारने देशभरात गाेंधळ निर्माण केला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) हे कुठल्या हेतूने लागू करण्यात आले हे तपासणे आवश्यक आहे. आसममध्ये पुन्हा एनआरसी लागू करण्याचा विचार केला जात आहे. आसाममध्ये आधी करण्यात आलेल्या एनआरसीमध्ये बाहेर पडलेले 14 ते 15 लाख नागरिक हे हिंदू आहेत. जे गरीब, आदिवासी, दलित, मागासवर्गीय लाेक आहेत. ते यात भरडले जात आहेत. एकीकडे देशात शेतकरी आत्महत्या करत असताना, आर्थिक मंदीला देश सामाेरा जात असताना या विषयांवरुन देशाचे लक्ष हटविण्यासाठी हे कायदे सरकारकडून आणले जात आहेत. 

देशाची नागरिकता धर्माच्या आधारावर देणे चुकीचे आहे. ज्याला नागरिकत्व हवे आहे त्याला देण्यास हरकत नाही. परंतु त्या व्यक्तीमुळे जर देशाला धाेका निर्माण हाेणार असेल तर त्या व्यक्तीला कधीच नागरिकत्व देऊ नये. परंतु विशिष्ट धर्माच्या आधारावर नागरिकत्व नाकारणे चुकीचे आहे. हे संविधानाच्या कलम 14 च्या विराेधात आहे. या नवीन कायद्यांचा भाजपसाेबत असणारे पक्ष सुद्धा विराेध करत आहेत. सरकारने या कायद्यांचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. 

काेणी राजकारणासाठी देशाला ताेडायचा प्रयत्न केला तरी हा देश एकसंध राहील. या देशाचा प्रत्येक नागरिक या भारतमातेचा सुपूत्र आहे. जे देश धर्माच्या आधारावर निर्माण झाले आहेत, त्यांची अवस्था आपल्या सगळ्यांसमाेर आहे. हा देश नेहमीच एकजूट राहील असेही पायलय यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी