शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

"आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार आणि अखंड भारतासाठी प्रयत्न करणार", देवेंद्र फडणवीस

By राजू इनामदार | Updated: August 9, 2022 21:15 IST

भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच

पुणे : आधी ३७० कलम हटवून काश्मिर भारताचे केले. आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार व नंतर अखंड भारतासाठी प्रयत्न करणार. तेही घेणारच असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांचीच अहिंसा असते, आमच्या नेतृत्वाकडे शक्ती होती, त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवला असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेला फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी दुपारी सुरूवात झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व नवनियुक्त मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपचे महामंत्री चंद्रशेखऱ् बावनकुळे, पुणे शहरातील पक्षाचे सर्व आमदार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपच्या शहर शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केले.

फडणवीस म्हणाले, भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच आहे, मात्र यापुर्वीच्या नेतृत्वात धमक नव्हती. त्यामुळे भारताचा हजारो एकर भूभाग चीनने गिळकृंत केला. आमच्या नेतृत्वात शक्ती आहे. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. डोकलाम केले. आमच्या जवानांना मारता तर आम्हीही तुमच्या जवानांना मारू हे दाखवून दिले. त्यामुळे चीनला अखेर तडजोड करावी लागली. राहूल गांधी यांनाही फडणवीस यांनी लक्ष्य केले. सर्जिकल स्ट्राईकला युवराजांनी पुरावा मागितला त्यावेळी ज्यांच्या घरातील लोक मारले गेले, त्यांना काय वाटले असेल याचा विचार माझ्या मनात येतो असे ते म्हणाले.

''मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा शक्तीशाली, समर्थ भारत घडतो आहे. हा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. ९ ऑगस्टला चले जाव ची घोषणा झाली, त्यावेळी बिहारमध्ये ६ हजार लोक झेंडे घेऊन रस्त्यावर आले. त्यांच्यावर ५०० गोळ्या झाडल्या गेल्या. असा माहितीच नसलेला इतिहास लोकापर्यंत न्यायचा आहे असे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातही अनेक आदिवासी नायक आहे. त्यांची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी असे प्रयत्न आहेत. विकास सर्वसमावेशक असावा. यापुर्वी फक्त काही लोकांचाच जीडीपी वाढायचा, आता असे होणार नाही असे फडणवीस म्हणाले.''

''स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्टला विभाजन दिन पाळायचा असे आवाहनही फडणवीस यांनी केले. इस्रायलची भूमी २ हजार वर्षे त्यांच्यापासून दूर होती, अखेर त्यांनी ती मिळवलीच. आपल्याही भूमीचा एक तुकडा त्यादिवशी वेगळा झाला. त्याचे शल्य जीवंत ठेवायचे, अखंड भारत केल्यानंतरच ते संपेल असे ते म्हणाले.'' 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान