शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार आणि अखंड भारतासाठी प्रयत्न करणार", देवेंद्र फडणवीस

By राजू इनामदार | Updated: August 9, 2022 21:15 IST

भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच

पुणे : आधी ३७० कलम हटवून काश्मिर भारताचे केले. आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार व नंतर अखंड भारतासाठी प्रयत्न करणार. तेही घेणारच असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांचीच अहिंसा असते, आमच्या नेतृत्वाकडे शक्ती होती, त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवला असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेला फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी दुपारी सुरूवात झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व नवनियुक्त मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपचे महामंत्री चंद्रशेखऱ् बावनकुळे, पुणे शहरातील पक्षाचे सर्व आमदार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपच्या शहर शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केले.

फडणवीस म्हणाले, भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच आहे, मात्र यापुर्वीच्या नेतृत्वात धमक नव्हती. त्यामुळे भारताचा हजारो एकर भूभाग चीनने गिळकृंत केला. आमच्या नेतृत्वात शक्ती आहे. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. डोकलाम केले. आमच्या जवानांना मारता तर आम्हीही तुमच्या जवानांना मारू हे दाखवून दिले. त्यामुळे चीनला अखेर तडजोड करावी लागली. राहूल गांधी यांनाही फडणवीस यांनी लक्ष्य केले. सर्जिकल स्ट्राईकला युवराजांनी पुरावा मागितला त्यावेळी ज्यांच्या घरातील लोक मारले गेले, त्यांना काय वाटले असेल याचा विचार माझ्या मनात येतो असे ते म्हणाले.

''मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा शक्तीशाली, समर्थ भारत घडतो आहे. हा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. ९ ऑगस्टला चले जाव ची घोषणा झाली, त्यावेळी बिहारमध्ये ६ हजार लोक झेंडे घेऊन रस्त्यावर आले. त्यांच्यावर ५०० गोळ्या झाडल्या गेल्या. असा माहितीच नसलेला इतिहास लोकापर्यंत न्यायचा आहे असे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातही अनेक आदिवासी नायक आहे. त्यांची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी असे प्रयत्न आहेत. विकास सर्वसमावेशक असावा. यापुर्वी फक्त काही लोकांचाच जीडीपी वाढायचा, आता असे होणार नाही असे फडणवीस म्हणाले.''

''स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्टला विभाजन दिन पाळायचा असे आवाहनही फडणवीस यांनी केले. इस्रायलची भूमी २ हजार वर्षे त्यांच्यापासून दूर होती, अखेर त्यांनी ती मिळवलीच. आपल्याही भूमीचा एक तुकडा त्यादिवशी वेगळा झाला. त्याचे शल्य जीवंत ठेवायचे, अखंड भारत केल्यानंतरच ते संपेल असे ते म्हणाले.'' 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान