शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

"आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार आणि अखंड भारतासाठी प्रयत्न करणार", देवेंद्र फडणवीस

By राजू इनामदार | Updated: August 9, 2022 21:15 IST

भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच

पुणे : आधी ३७० कलम हटवून काश्मिर भारताचे केले. आता पाकव्याप्त काश्मिरही घेणार व नंतर अखंड भारतासाठी प्रयत्न करणार. तेही घेणारच असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांचीच अहिंसा असते, आमच्या नेतृत्वाकडे शक्ती होती, त्यांनी सर्जिकल स्ट्राईक घडवला असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेला फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी दुपारी सुरूवात झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व नवनियुक्त मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, भाजपचे महामंत्री चंद्रशेखऱ् बावनकुळे, पुणे शहरातील पक्षाचे सर्व आमदार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. भाजपच्या शहर शाखेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केले.

फडणवीस म्हणाले, भारताच्या सैन्यात चांगली क्षमता आधीपासूनच आहे, मात्र यापुर्वीच्या नेतृत्वात धमक नव्हती. त्यामुळे भारताचा हजारो एकर भूभाग चीनने गिळकृंत केला. आमच्या नेतृत्वात शक्ती आहे. त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. डोकलाम केले. आमच्या जवानांना मारता तर आम्हीही तुमच्या जवानांना मारू हे दाखवून दिले. त्यामुळे चीनला अखेर तडजोड करावी लागली. राहूल गांधी यांनाही फडणवीस यांनी लक्ष्य केले. सर्जिकल स्ट्राईकला युवराजांनी पुरावा मागितला त्यावेळी ज्यांच्या घरातील लोक मारले गेले, त्यांना काय वाटले असेल याचा विचार माझ्या मनात येतो असे ते म्हणाले.

''मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवा शक्तीशाली, समर्थ भारत घडतो आहे. हा भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. ९ ऑगस्टला चले जाव ची घोषणा झाली, त्यावेळी बिहारमध्ये ६ हजार लोक झेंडे घेऊन रस्त्यावर आले. त्यांच्यावर ५०० गोळ्या झाडल्या गेल्या. असा माहितीच नसलेला इतिहास लोकापर्यंत न्यायचा आहे असे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातही अनेक आदिवासी नायक आहे. त्यांची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहचावी असे प्रयत्न आहेत. विकास सर्वसमावेशक असावा. यापुर्वी फक्त काही लोकांचाच जीडीपी वाढायचा, आता असे होणार नाही असे फडणवीस म्हणाले.''

''स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला म्हणजे १४ ऑगस्टला विभाजन दिन पाळायचा असे आवाहनही फडणवीस यांनी केले. इस्रायलची भूमी २ हजार वर्षे त्यांच्यापासून दूर होती, अखेर त्यांनी ती मिळवलीच. आपल्याही भूमीचा एक तुकडा त्यादिवशी वेगळा झाला. त्याचे शल्य जीवंत ठेवायचे, अखंड भारत केल्यानंतरच ते संपेल असे ते म्हणाले.'' 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणBJPभाजपाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान