शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

"...आता महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे", बारामतीत शरद पवारांनी फुंकले विधानसभेचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 09:33 IST

वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे जनसंवाद दाैऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते...

बारामती (पुणे) : काही लोक त्यांच्याकडे असणाऱ्या सत्तेचा गैरवापर करतात. सत्तेचा वापर करुन लोकांचे प्रश्न सोडवत नाहीत. लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवावी लागेल. त्यासाठी येणारी निवडणुक आहे. लोकसभेत तुम्ही चांगले काम केले. आता काही झालं तरी महाराष्ट्र हातात घ्यायचा आहे. शेतकरी, मजुर, कामगांरांसह प्रत्येक घटकासाठी सत्तेचा वापर करायचा आहे. तुमचे प्रश्न सोडवून योग्य दिवस येतील अशी काळजी घेतली जाईल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

वडगांव निंबाळकर (ता. बारामती) येथे जनसंवाद दाैऱ्याच्या वेळी आयोजित सभेत पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या ऊस गाळपासह, ऊस दर, साखर वीज, इथेनाॅलच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने साखरधंदा अडचणीत आला. संस्थाचालकांना माझी विनंती आहे, बाबांनो इतके वर्ष तुम्ही आमचे आशीर्वाद घेतले.आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या भल्यासाठी पाठिंबा दिला. मात्र, या सगळ्यांच्या भल्याची तुम्हाला आठवण नसेल तर तुमच्यासाठी काय करायचे याचा निकाल आम्हाला घ्यावा लागेल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह साखर कारखाना पदाधिकाऱ्यांचे नाव न घेता इशारा दिला.

पवार पुढे म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणुक वेगळी होती, ती सोपी नव्हती. देशात आणि परदेशात देखील या निवडणुकीची चर्चा झाली. राज्याची सत्ता दुसऱ्यांच्या हातात आहे, काही लोकांना दमदाटीचे प्रकार घडले. सगळ्या देशात इथ काय होईल, याची शंका होती. आमचे पदाधिकारी गावोगाव जात असत. पहिली निवडणूक यावेळी गावात पुढे कोणी येत नव्हते, सर्वजण शांत होते. न बोलणारी यंदा निवडणूक झाली. त्यामुळे अनेकांना या ठिकाणी काय होईल, याची काळजी होती. मात्र मला खात्री होती नेमके तेच घडले. जे लोक पुढे येत नव्हते, शांत होते. त्यांना कोणते बटण दाबायचे हे सांगावे लागले नाही. मतमोजणी झाल्यावर हे स्पष्ट झाले. त्यामुळे आम्हाला आता लोकांच्या कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल, असे पवार म्हणाले.

आज राज्यात वेगळ्या लाेकांची सत्ता आहे. मोदीसाहेब देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी सबंध देशात वेगळा विचार दाखवायचा प्रयत्न  केला. त्यांच्यासमोर कोणी टिकणार नाही, असे लोकांना वाटले. राज्यात त्यांनी १६ ठिकाणी सभा घेतल्या. माझे भाग्य प्रत्येक ठिकाणी त्यांनी माझे नाव घेत टीका केली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. ज्या बारामतीची शंका होती, त्याठिकाणी ४० हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, सत्तेचा गैरवाप करणारे असो, वेगळे भाष्य करणारे असो, फोन करुन धमकी दिलेली असो, सगळ्यांनी याची नोंद न घेता योग्य ठिकाणी मतदान करीत मतांचा विक्रम केल्याचे पवार म्हणाले. यावेळी युगेंद्र पवार, सदाशिव सातव, अॅड एस. एन जगताप, सतीश खाेमणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

‘साहेबां’ची आतापासूनच बारामतीत तळ ठोकण्यास सुरुवात-

बारामती विधानसभा निवडणूक शरद पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी आतापासूनच बारामती शहर आणि तालुका पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. पवार यांनी घातलेले लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारे आहे. मागील आठवड्यापासूनच शरद पवार यांनी बारामतीत विशेष लक्ष घातले आहे. त्यांनी डाॅक्टर, व्यापारी, वकील आदी मेळावे घेत दुष्काळी दाैरे केले. त्यापाठोपाठ दुसऱ्याच आठवड्यात तीन दिवसांच्या दाैऱ्यांवर पवार आले आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी युगेंद्र पवार यांना बरोबर घेत निंबुत, वडगांव निंबाळकर, कोर्हाळे, करंजे पुल, माळेगांव येथे जनसंवाद दाैरे आयोजित करीत संवाद साधला. १९ जुन रोजी पवार यांचे सकाळपासून सायंकाळपर्यंत सांगवी, खांडज, निरावागज, डोर्लेवाडी, काटेवाडी, पिंपळी येथे शेतकरी, ग्रामस्थ यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत. तर गुरुवारी (दि. २०) रोजी ते पणदरे, लाटे, लोणीभापकर, मोरगाव येथे शेतकरी संवाद साधणार आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBaramatiबारामतीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड