शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

आता नायब तहसीलदारही करणार मिळकतीत हिस्स्याच्या निकालाची अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:42 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण

पुणे : वडिलोपार्जित मिळकतीत हिस्सा मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी तहसीलदारांसह आता नायब तहसीलदारही करू शकणार आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा निर्णय घेतला असून, जिल्ह्यात अशी सुमारे चौदाशे प्रकरणे आहेत. निर्णय लवकर झाल्यास अर्जदारांना आपल्या हक्काची मिळकत तातडीने मिळण्यास मदत होणार आहे.एखाद्या वडिलोपार्जित मिळकतीत वारसांना डावलण्यात आले असल्यास संबंधित नागरिक दिवाणी न्यायालयात दावा दाखल करतात. दाव्याची बाजू लक्षात घेऊन न्यायालयाकडून निकाल दिला जातो. त्यात मिळकतीत हिस्सा द्यावा एवढेच नमूद केले जाते, तर मिळकतीत नेमका कोणता हिस्सा द्यावा, याचे अधिकार कायद्यानुसार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे तहसीलदार भूमिअभिलेख विभागाकडून संबंधित मिळकतीची चतु:सीमा निश्चित करून हिस्स्यांची विभागणी करून घेतात. त्यानंतर तहसीलदार पक्षकारांची एकत्रित सुनावणी घेऊन हिस्सा निश्चित करून न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करतात.जिल्ह्यात डिसेंबर २०२४ अखेर एकूण एक हजार ३९३ न्यायालयाचे निकाल हिस्स्यांच्या विभागणीसाठी प्रलंबित आहेत. सध्या तहसीलदारांकडे विविध विभागांची कामे असल्याने त्यांच्याकडील वेळ लक्षात घेता तहसीलदारांना देण्यात आलेले आदेश नायब तहसीलदारांना प्रदान करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डुडी यांनी घेतला आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात प्रकरणांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणचे तहसीलदार नायब तहसीलदारांच्या मदतीने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करतील.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ मार्च ते १० जून या कालावधीमध्ये ही सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे ठरविले आहे. त्यानुसार १५ मार्च ते १५ एप्रिल या दरम्यान मिळकतींची मोजणी पूर्ण करून वाटप तक्ता तहसीलदारांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ एप्रिल ते १५ मे या काळात तालुकास्तरावर वाटप तक्ता मंजूर करण्यात येईल. १६ मे ते ३१ मेदरम्यान हिस्सेदारांना ताबा देणे व ताबा पावती तयार करणे यावर कार्यवाही करण्यात येणार आहे, तर १ जून रोजी ताबा पावतीनुसार फेरफार मंजूर करून दुरुस्त केलेले सातबारा उतारे तयार करून त्याचे वाटप संबंधितांना करण्यात येईल. १ जून ते १० जून या काळात न्यायालयाच्या निकालानुसार अंमलबजावणी झाल्याचे न्यायालयाला कळविण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (कुळकायदा शाखा) नामदेव टिळेकर यांनी दिली.

नागरिकांच्या जिव्हाळ्याची ही प्रकरणे असतात. कामाच्या भारामुळे तहसीलदार त्यावर तातडीने अंमलबजावणी करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करून नायब तहसीलदारांना देण्यात आले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय होऊन पक्षकारांना दिलासा मिळेल.  - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यामुळे प्रलंबित प्रकरणे लवकर मार्गी लागून संबंधित हिस्सेदारांना आपल्या हक्काचा वाटा तातडीने मिळू शकणार आहे. - सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcollectorजिल्हाधिकारी