शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

...आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:35 IST

आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल...

ठळक मुद्देडॉ. पुष्कर श्रोत्री लिखित  ‘मनु’चे अरण्य’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : राज्यातील जंगले आता उजाड होत चालली आहेत. शासनानेच काही आहे ते करावे अशी आपली मानसिकता कधी बदलणार? अशाने पर्यावरणाचे भले होणार नाही. आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल. झाडे ही टिकवावी लागतात. ती तोडावीच लागतात असे नाही. पर्यावरणाविषयक संवेदनशीलता हरपत चालल्यानेच की काय आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.  लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि राजहंस प्रकाशन प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. संदीप श्रोत्री लिखित  ‘मनु’चे अरण्य या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या सोहळयाला प्रख्यात अभिनेते व पर्यावरणमित्र मिलिंद गुणाजी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, अभियंता दीपक मोडक, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मसापचे शहर प्रतिनिधी शिरीष चिट्णीस उपस्थित होते.  पर्यावरणाची दिवसेंदिवस होत चाललेली हानी यावर परखड मत व्यक्त करताना पुरंदरे म्हणाले, देशात खरोखर माणसे राहतात का? हा प्रश्न पडतो. आपण आपल्या देशातील पर्यावरणाची स्थिती बघावी मग आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करावा. जंगले उजाड होत चालली आहेत. गौरवशाली, वैभवशाली अशा सह्याद्री आता खुप उजाड पडला आहे. त्यावर झाड नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात पर्यावरणविषयक महत्वाचे विचार मांडले होते. याचा आपल्या सर्वांना विसर पडला आहे. जंगले वाचवा ती मरु देऊ नका. प्रत्यक्षात शहरातील माणसांच्या दारात साधी तुळसदेखील पाहवयास मिळत नाही. आमच्याकडे केवळ उत्सव साजरे केले जातात. दुसरीकडे झाडांवर क्रुर व निष्ठुरपणे हल्ले होतात. निदान प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. अशा शब्दांत बाबासाहेबांनी पर्यावरणविषयक भावना व्यक्त केल्या.  गुणाजी यांनी डॉ. श्रोत्री यांच्या पुस्तकातील महत्वाच्या मुद्यांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले. अँमेझॉनमधील प्राणी-पक्षी जीवन, निसर्गवाचन याबद्द्लच्या विविध छटा वाचकांना मनुच्या अरण्यातून वाचावयास मिळतील. याप्रसंगी त्यांनी आपल्या निसर्गप्रेमावर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. जोशी म्हणाले, निसर्गाचे वेगवेगळे रुप त्याचा परिचय पुस्तकाच्या निमित्ताने पर्यावरण अभ्यासक व वाचकांना होईल. त्यात पर्यावरणविषयक जागृती तर आहेच याशिवाय त्याची संवेदनशीलता जपण्यात आली आहे. निसर्गाचा ºहास करुन मानवाची प्रगती होणार नाही. याचा विचार त्याने करण्याची गरज आहे.   

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेenvironmentपर्यावरणGovernmentसरकार