शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:35 IST

आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल...

ठळक मुद्देडॉ. पुष्कर श्रोत्री लिखित  ‘मनु’चे अरण्य’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : राज्यातील जंगले आता उजाड होत चालली आहेत. शासनानेच काही आहे ते करावे अशी आपली मानसिकता कधी बदलणार? अशाने पर्यावरणाचे भले होणार नाही. आताच पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर नजीकचा भविष्यकाळ मानवाकरिता अवघड असेल. झाडे ही टिकवावी लागतात. ती तोडावीच लागतात असे नाही. पर्यावरणाविषयक संवेदनशीलता हरपत चालल्यानेच की काय आता आपला सह्याद्री गरीब झाला आहे, अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.  लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि राजहंस प्रकाशन प्रा.लि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. संदीप श्रोत्री लिखित  ‘मनु’चे अरण्य या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. त्या सोहळयाला प्रख्यात अभिनेते व पर्यावरणमित्र मिलिंद गुणाजी, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे, अभियंता दीपक मोडक, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मसापचे शहर प्रतिनिधी शिरीष चिट्णीस उपस्थित होते.  पर्यावरणाची दिवसेंदिवस होत चाललेली हानी यावर परखड मत व्यक्त करताना पुरंदरे म्हणाले, देशात खरोखर माणसे राहतात का? हा प्रश्न पडतो. आपण आपल्या देशातील पर्यावरणाची स्थिती बघावी मग आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करावा. जंगले उजाड होत चालली आहेत. गौरवशाली, वैभवशाली अशा सह्याद्री आता खुप उजाड पडला आहे. त्यावर झाड नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात पर्यावरणविषयक महत्वाचे विचार मांडले होते. याचा आपल्या सर्वांना विसर पडला आहे. जंगले वाचवा ती मरु देऊ नका. प्रत्यक्षात शहरातील माणसांच्या दारात साधी तुळसदेखील पाहवयास मिळत नाही. आमच्याकडे केवळ उत्सव साजरे केले जातात. दुसरीकडे झाडांवर क्रुर व निष्ठुरपणे हल्ले होतात. निदान प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. अशा शब्दांत बाबासाहेबांनी पर्यावरणविषयक भावना व्यक्त केल्या.  गुणाजी यांनी डॉ. श्रोत्री यांच्या पुस्तकातील महत्वाच्या मुद्यांकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले. अँमेझॉनमधील प्राणी-पक्षी जीवन, निसर्गवाचन याबद्द्लच्या विविध छटा वाचकांना मनुच्या अरण्यातून वाचावयास मिळतील. याप्रसंगी त्यांनी आपल्या निसर्गप्रेमावर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. जोशी म्हणाले, निसर्गाचे वेगवेगळे रुप त्याचा परिचय पुस्तकाच्या निमित्ताने पर्यावरण अभ्यासक व वाचकांना होईल. त्यात पर्यावरणविषयक जागृती तर आहेच याशिवाय त्याची संवेदनशीलता जपण्यात आली आहे. निसर्गाचा ºहास करुन मानवाची प्रगती होणार नाही. याचा विचार त्याने करण्याची गरज आहे.   

टॅग्स :PuneपुणेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेenvironmentपर्यावरणGovernmentसरकार