शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Diwali Vacation: आता गावी कसं जायचं! रेल्वे बुकिंग फुल्ल; विमानांची संख्याही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 09:53 IST

दिवाळी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी

पुणे : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे लोकांनी सुट्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. पुण्याहून सुटणाऱ्या ९८ टक्के रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाल्यामुळे आता गावी कसे जायचे? हा प्रश्न लोकांना पडला आहे. याउलट कोरोनानंतर रविवारी पहिल्यांदाच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १७२ प्रवासीविमानांची ये-जा झाली, त्याद्वारे २५ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद केली आहे. ही संख्या दिवाळीच्या सुट्यांमुळे आणखी वाढणार असल्याने विमानाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विमानाचा प्रवास आजही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरचा असल्याने त्यांचे प्रथम प्राधान्य रेल्वेलाच असते. पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या रेल्वेंपैकी ९८ टक्के रेल्वे फुल्ल झाल्याने परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे अजूनपर्यंत रेल्वे बोर्डाकडून दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे दिवाळी विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

का वाढते प्रवासी संख्या?

- राज्याच्या विविध भागातील नागरिक कामानिमित्त मोठ्या संख्येने पुणे जिल्ह्यात आले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाल्याने ही संख्या वाढत गेली.- पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणूनदेखील ओळखले जाते, त्यामुळे लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात. दिवाळीत विद्यार्थ्यांना १५ ते २० दिवस सुटी असते. त्यामुळे बहुतांश पालक दिवाळीनिमित्त गावी जातात किंवा फिरायला जाण्याचे नियोजन करतात. परिणामी पुण्यातून सुटीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.- मध्य रेल्वेकडून गणेशोत्सव, छटपूजा आणि उन्हाळी सुटी विशेष रेल्वे चालवल्या जातात. याच प्रकारे दिवाळी विशेष रेल्वे कधी सुरू करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.- पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या विमानांच्या संख्येत वाढ केली असून, दिवसाला १५ ते १७ हजार प्रवासी विमानाने ये-जा करतात. इतर ठिकाणच्या विमानांच्या संख्येत देखील वाढ होणे गरजेचे आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021railwayरेल्वेairplaneविमानSocialसामाजिकpassengerप्रवासी