शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

12th Admission: आता बारावीच्या विद्यार्थ्यांना बदलता येणार महाविद्यालय; गैरसाेय टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 10:53 IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना याेग्य कारण असेल, तर त्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय बदलता येणार

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांना याेग्य कारण असेल, तर त्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय बदलता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयास बदलण्याच्या कारणांची खातरजमा करून मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये, इच्छित ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाेय टळण्यास मदत हाेईल.

बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेकवेळा महाविद्यालय सध्याच्या घरापासून लांब असणे, पालकांची बदली, पत्त्यात बदल, स्थलांतर, शाखा बदल, बाेर्ड बदल तसेच वैद्यकीय कारणास्तव ते राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्यासाठी विद्यार्थी अर्ज करतात किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थी बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात. विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी ती मागणी याेग्यही असते.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत राहून बारावीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालयाच्या स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार हा बदल केला जाईल. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून घ्यावी, असे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बारावीसाठी महाविद्यालय बदलण्याचा अर्ज आल्यावर त्यावर प्रक्रिया करताना त्याची कारणे आणि गुणवत्ता यांचे काटेकोर पालन करण्याची खबरदारी घ्यावी. याबाबत कोणतीही अनियमितता राहणार नाही, याची दक्षता पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी घेणे गरजेचे आहे, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिले आहेत.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षक