शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

12th Admission: आता बारावीच्या विद्यार्थ्यांना बदलता येणार महाविद्यालय; गैरसाेय टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 10:53 IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना याेग्य कारण असेल, तर त्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय बदलता येणार

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांना याेग्य कारण असेल, तर त्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय बदलता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयास बदलण्याच्या कारणांची खातरजमा करून मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये, इच्छित ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाेय टळण्यास मदत हाेईल.

बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेकवेळा महाविद्यालय सध्याच्या घरापासून लांब असणे, पालकांची बदली, पत्त्यात बदल, स्थलांतर, शाखा बदल, बाेर्ड बदल तसेच वैद्यकीय कारणास्तव ते राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्यासाठी विद्यार्थी अर्ज करतात किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थी बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात. विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी ती मागणी याेग्यही असते.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत राहून बारावीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालयाच्या स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार हा बदल केला जाईल. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून घ्यावी, असे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बारावीसाठी महाविद्यालय बदलण्याचा अर्ज आल्यावर त्यावर प्रक्रिया करताना त्याची कारणे आणि गुणवत्ता यांचे काटेकोर पालन करण्याची खबरदारी घ्यावी. याबाबत कोणतीही अनियमितता राहणार नाही, याची दक्षता पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी घेणे गरजेचे आहे, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिले आहेत.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षक