शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

12th Admission: आता बारावीच्या विद्यार्थ्यांना बदलता येणार महाविद्यालय; गैरसाेय टळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 10:53 IST

बारावीच्या विद्यार्थ्यांना याेग्य कारण असेल, तर त्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय बदलता येणार

पुणे : बारावीच्या विद्यार्थ्यांना याेग्य कारण असेल, तर त्यांना प्रवेश मिळालेले महाविद्यालय बदलता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयास बदलण्याच्या कारणांची खातरजमा करून मंजूर जागांच्या मर्यादेमध्ये, इच्छित ठिकाणी जागा उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसाेय टळण्यास मदत हाेईल.

बारावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेकवेळा महाविद्यालय सध्याच्या घरापासून लांब असणे, पालकांची बदली, पत्त्यात बदल, स्थलांतर, शाखा बदल, बाेर्ड बदल तसेच वैद्यकीय कारणास्तव ते राहत असलेल्या परिसरात कनिष्ठ महाविद्यालय बदलून मिळण्यासाठी विद्यार्थी अर्ज करतात किंवा इतर कारणांमुळे विद्यार्थी बारावीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय बदलून देण्याची मागणी करतात. विद्यार्थ्यांच्या साेयीसाठी ती मागणी याेग्यही असते.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कनिष्ठ महाविद्यालयाला मंजूर जागांच्या मर्यादेत राहून बारावीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलून देण्याची कार्यवाही महाविद्यालयाच्या स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जागा उपलब्ध असण्याच्या अटीनुसार हा बदल केला जाईल. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यानंतर आवश्यक त्या सुधारणा करून घ्यावी, असे विभागीय शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बारावीसाठी महाविद्यालय बदलण्याचा अर्ज आल्यावर त्यावर प्रक्रिया करताना त्याची कारणे आणि गुणवत्ता यांचे काटेकोर पालन करण्याची खबरदारी घ्यावी. याबाबत कोणतीही अनियमितता राहणार नाही, याची दक्षता पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी घेणे गरजेचे आहे, असे निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिले आहेत.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षणTeacherशिक्षक