शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

पुण्यातील तीन कंपन्यांना कर्मचारी कपात केल्याने वकिलांकडून नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 19:28 IST

कोणतेही कारण न देता कर्मचारी कपात केल्यामुळे दोन वकिलांनी संबंधीत कंपन्यांना नोटीस कंपन्यांनी आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन द्यावे अशी नोटिसद्वारे मागणी

ठळक मुद्देकंपन्यांनी आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन द्यावे अशी मागणी

पुणे :  टाळाबंदीच्या काळात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नये असे आवाहन देशाचे पंतप्रधानपद नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तरी देखील  काही कंपन्या कर्मचारी कपात करत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील अशा तीन कंपन्यांनी कोणतेही कारण न देता कर्मचारी कपात केल्यामुळे दोन वकिलांनी संबंधीत कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. अ‍ॅड. राजेश इनामदार आणि अ‍ॅड. तोसिफ शेख यांनी पुण्यातील तीन कंपन्याना नोटीस पाठवली आहे. या कंपन्यांनी जवळपास शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. तर इतरांसाठी वेतन कपातीचीही घोषणा देखील केली आहे. देशातील सर्व कॉपोर्रेट कंपन्या आणि संस्थांनी या परिस्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांच्या मागे उभं रहावं. त्यांना मानसिक आणि आर्थिक संकटात सोडू नये, असंही इनामदार आणि शेख यांनी यावेळी  सांगितले. लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांना घरी राहावे  लागत आहे. पण याच काळात त्यांच्यावर बेरोजगारीचं संकटही कोसळतंय. आपत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संबंधित कंपन्यांवर कारवाई होऊ शकते. कंपन्यांनी कोणतीही नोटीस न देता कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे आणि इतरांच्या वेतनात कपात जाहीर केली आहे. काही कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलंय. विविध कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीसवर ठेवलं असून त्यांच्या भविष्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं नोटीसीमध्ये नमूद करण्यात आल आहे. या कंपन्यांचा निर्णय हा बेकायदेशीरच नाही, तर असंवेदनशील आणि दंडात्मकही आहे. त्यामुळे  या कंपन्यांनी आपला निर्णय तातडीने मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन द्यावे अशी मागणी नोटिसद्वारे करण्यात आलीआहे.

टॅग्स :Puneपुणेbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीadvocateवकिल