शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

पवना भरूनही उपयोग शून्य; दररोज पाणी मिळणार केव्हा? प्रशासकराजचा नागरिकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 13:59 IST

यंत्रणा नसल्याची कबुली...

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : पिंपरी - चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्यानंतर आता दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढली आहे. मात्र, शहराला दरदिवशी पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणाच नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट आहे.

शहरात चारही बाजूने टोलेजंग इमारती उभ्या राहत असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी, शहराच्या टोकाच्या भागांतील म्हणजे दापोडी, फुगेवाडी, सांगवी, पिंपळे निलख, दिघी, भोसरी, चिखली, मोशी येथे सातत्याने पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. शटडाऊन, बिघाड, दुरुस्तीकाम तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सुरळीत पाणीपुरवठा न झाल्याने सलग दोन - तीन दिवस अनेक भागांत तक्रारी वाढतात. जनसंवाद सभेत पाण्याबाबतच्या तक्रारी अधिक येतात. महापालिकेकडे पाणीपुरवठ्याबाबत नियोजनच नाही. त्यामुळे नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

गळती रोखण्याकडे दुर्लक्ष

सध्या पवना नदीतून उचलून शहराला ४८० ते ४९० एमएलडी पाणी पुरविले जात आहे. आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी येते. एमआयडीसीचेही पाणी काही भागांना दिले जात आहे. या एकूण ५३४ एमएलडी पाण्यापैकी ३० ते ३५ टक्के पाण्याची गळती होत असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. चोरी, अनधिकृत नळजोडणी, गळती आदींमुळे पाणी वाया जात आहे. गळती रोखण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

दिवसाआड पुरवठ्यावर प्रशासन ठाम

धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा होईल, अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, दररोज पाणीपुरवठा केल्यास चढावरील भागात पाणी जात नाही. दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे सर्वांना समान पाणी मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी पुरवठ्यावर प्रशासन ठाम आहे. दररोज पाणीपुरवठ्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत धरण १०० टक्के राहिल्यानंतर १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पाणी पुरेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरण