शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:11 IST

जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पवार बोलत होते...

पुणे : गेली ९ वर्षे देश प्रगतीपथावरून जात आहे. राज्यातही विकास करण्यासाठी महायुतीचे सरकार काम करत आहे. पुणे जिल्ह्यात विमानतळ उभे करण्यासाठी जमीन महत्त्वाची आहे. यासाठी योग्य मोबदला देणे गरजेचे आहे. सध्याचे सरकार विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे. राज्यातील बसस्थानके स्वच्छ आणि चांगली होतील यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात कुठलाही विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात, त्यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष करावे. शेतकऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही सर्व कामे दोन वर्षांत पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. यापूर्वी चंद्रकांत पाटील काम करत होते. आता मी आणि दिलीप वळसे पाटील आणि चंद्रकांत पाटील मिळून काम करणार आहोत.

जे कंत्राटदार चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. पण जे कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. हे सरकार पहिले दोन इंजिनच होते, आता त्यात आमचं एक इंजिन जोडलं गेल्याने हे तीन इंजिनच सरकार उत्तम काम करेल, असंही पवार म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार