शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी"; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 15:14 IST

आगामी निवडणुकांत जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही

पुणे - गेल्या अनेक महिन्यांपासून मनसेत घुसमट होत असलेल्या पुण्यातील मनसेच्या वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राम राम करत राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र केला. वसंत मोरे यांनी मनसे पक्षाला सोडचिठ्ठी देत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, पक्षाच्या कोअर कमिटीवर थेट आरोप करत पुढील राजकीय भूमिकेवरही भाष्य केलं. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. यापुढे मी काय करायचे हे पुणेकर ठरवतील, असे मोरेंनी म्हटले. तर, अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर आहेत, पण भाजपाकडून कुठलीही ऑफर नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.  

आगामी निवडणुकांत जर लोकसभा लढवायची ठरवली तर मी एकटा लढणार, माझ्या घरातील मी पहिला राजकारणी, कुणाच्या कुबड्या घेऊन पुढे आलो नाही. राजसाहेबांच्या हृदयात मी स्थान निर्माण केले, पण ते डळमळीत करण्याचं काम पुणे कोअर कमिटी करतेय, असा आरोप करत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, मला अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर्स आहेत, पण भाजपाकडून कुठलीही ऑफर नसल्याचं मोरेंनी स्पष्ट केलं. मात्र, मला खासदार व्हायचं आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे, वसंत मोरे नेमकं कोणत्या पक्षातून निवडणूक लढतात हे पाहावे लागेल.  

मला यापूर्वीच अनेक पक्षांकडून ऑफर्स होत्या, मला शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून ऑफर होत्या. तर, भाजपाकडून कुठलीही ऑफर नाही. तसेच, ईडी किंवा सीबीआयकडून धमक्याही मिळाल्या नाहीत, माझ्याकडे आहेच काय, असा मिश्कील सवालही मोरेंनी केला. तर, जे आहे ते मी माझ्या स्वबळावर कमावलेलं आहे, असेही मोरेंनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

शरद पवारांची भेट कात्रजमधील कामासाठी 

मी शरद पवारांची भेट घेतली, ती कात्रज मतदारसंघातील कामासाठी घेतली होती. ती कुठलीही राजकीय भूमिका नव्हती. गेल्या २-३ वर्षापासून माझ्यावर अन्याय सुरू होता. वारंवार माझ्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे केले. मी संघटना वाढीसाठी प्रयत्न केलेत. सामान्य महाराष्ट्र सैनिकांनाही विचारलं तर ते सांगतील. पण काहींना संघटना मजबूत करायची नाही. निवडणूक लढवायची नाही. पुणे शहरात मनसेची ताकद नाही. निवडणूक लढण्यासारखे वातावरण नाही असा चुकीचा अहवाल दिला. कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची होती परंतु नेत्यांनी चुकीचा अहवाल दिला असा आरोप वसंत मोरे यांनी केला.

टॅग्स :MNSमनसेPuneपुणेMumbaiमुंबईRaj Thackerayराज ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक