शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पूररेषा योग्य न आखल्यामुळे कोल्हापूरात महापूर : पर्यावरणवाद्यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 20:44 IST

पंचगंगा नदीची निळी आणि लाल पूर रेषा निम्म्यापेक्षा जास्त आत घेतल्याने सुमारे 500 हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे..

ठळक मुद्देनिवासी बांधकामासाठी बदलली पूररेषा कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्यात  पंचगंगा नदीच्या पूररेषेत बदल शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पूररेषेच्या आत अतिक्रमण

पुणे : कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्यात पंचगंगा नदीसाठीपूररेषा शास्त्रीय पद्धतीने चिन्हांकित करण्याऐवजी ती 1984,1989 आणि 2005 मध्ये आलेल्या पुराच्या पातळ्यांवर ठरविण्यात आली. त्यावर न्यायालयाने आक्षेप घेत जलसंपदा विभागाला शास्त्रीय पूर रेषा चिन्हांकित करण्याचे आदेश दिले. त्यानंतर केलेल्या पूररेषा सर्वेक्षणात सुमारे ५०० हेक्टर (१२३५ एकर) जमीन पुराच्या पाण्यामुळे बाधित होणारे निवासी क्षेत्र दाखविण्यात आले. या निवासी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात बांधकामे केली, तसेच अनेक ठिकाणी जमिनीची उंची वाढविली. परिणामी पूर पातळीत वाढ झाली, असा आरोप पर्यावरण तज्ज्ञ सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी माहिती अधिकर कार्यकर्ते विजय कुंभार, सजग नागरिक  मंचाचे जुगल राठी, एनएपीएमच्या सुनीती सु.र. उपस्थित होते.   यादवाडकर म्हणाले की, कोल्हापूर शहराच्या विकास आराखड्यात  पंचगंगा नदीच्या पूर रेषेत बदल केला आहे. नदीच्या ज्या पूर रेषा हव्या आहेत, त्यापेक्षा त्या कमी करून विकास आराखड्यावर अधोरेखित करण्यास सरकारने परवानगी दिली. पाटबंधारे खात्याने पूर रेषा निम्यापेक्षा खाली आणलेली आहे. परिमाणी पूररेषेच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन पूर पातळीत मोठी वाढ झाली.पंचगंगा नदीची निळी आणि लाल पूर रेषा निम्म्यापेक्षा जास्त आत घेतल्याने सुमारे 500 हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यावेळेच्या पूराचा सर्वाधिक फटका याच क्षेत्रात बसला आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याला पूर रेषा आत घेण्याची गरज का वाटली, असा प्रश्न ही यादवाडकर यांनी उपस्थित केला.

.............. पुण्यालाही बसू शकतो पूराचा फटका शहरातून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पूररेषेच्या आत अतिक्रमण करण्यात आलेले आहेत. हे अतिक्रमणे कायदेशीर करण्यासाठी पूर रेषा बदलल्या जात आहेत. अशा परिस्थित पुण्याच्या वरील धरणातून जास्त पाणी सोडल्यास सांगली, कोल्हापूरपेक्षा मोठी हानी शहरामध्ये होऊ शकते, अशी भीती पर्यावरण वाद्यांनी यावेळी व्यक्त केली.................................................................................................... मॉल, हॉस्पीटल, बांधकाम व्यावसायिकांना बांधकामांच्या परवानग्या मिळाल्या कशा ?  बांधकामांसाठी पूर रेषा बदलली गेली. यावरून व्यावसायिकांच्या दबावापुढे सरकार किती हतबल आहे हे दिसुन येते. धरणांची देखरेख नियमित करण्याची गरज आहे, सध्याची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सरकार योग्य वेळी पावले उचलू शकत होते. मात्र, पूररेषेच्या आत बांधकाम करण्यास मुख्यमंत्री परवानगी कशी दिली जाते. मुख्यमंत्र्यांना योग्य माहिती संबधित विभागानी दिली नाही असे यातून स्पष्ट होते. - सुनीती सु. र. ...................................................................................................

 

टॅग्स :PuneपुणेriverनदीfloodपूरState Governmentराज्य सरकारEnchroachmentअतिक्रमण