शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

कुठलाही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही : व्यंकय्या नायडू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 14:55 IST

दहशतवाद, हिंसाचार, भेदभाव, गरिबी ही आपल्या पुढील आव्हाने आहेत...

ठळक मुद्देविश्वशांतीचा संदेश देणारा हा घुमट जगातले नवे आश्चर्य म्हणून ओळखले जाईल राजकारण्यांनी प्रशासन कसे चालते याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक

पुणे : दहशतवाद, हिंसाचार, भेदभाव, गरिबी ही आपल्या पुढील आव्हाने आहेत. दहशतवाद ही गंभीर समस्या असून कुठलाही धर्म त्याचे समर्थन करीत नाही. दहशतवादाविरुद्ध सगळ्या देशांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे लोणीकाळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटाचे नायडू यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, विजय भटकर, राहुल कराड, खासदार विकास महात्मे उपस्थित होते.नायडू म्हणाले, विश्वशांतीचा संदेश देणारा हा घुमट जगातले नवे आश्चर्य म्हणून ओळखले जाईल. राजकारण्यांनी राजकारणात येण्यापूर्वी सार्वजनिक आयुष्यात कसे वागावे, प्रशासन कसे चालते याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जग बदलत आहे तसेच भारतही बदलत आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये जगात एकात्मता आणि शांतता नांदली पाहिजे. संत ज्ञानेश्वर यांनी लहान वयात विश्वात शांतता नांदण्याबाबत चिंतन केले, ही थोर परंपरा आपल्याला लाभली आहे.

टॅग्स :PuneपुणेmitएमआयटीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTerrorismदहशतवाद