शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

यंदा गणपतीची वर्गणी नाही! पुण्यातील सार्वजनिक गणेशमंडळांचा उत्स्फूर्त व कौतुकास्पद निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 22:04 IST

कोरोनामुळे आताची परिस्थिती फारच अवघड झाली आहे. लोक चार महिने घरात बसून आहेत, अशावेळी वर्गणी मागणे योग्य नाही...

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उपक्रम राबवणार  व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट

अतुल चिंचली-पुणे: दरवर्षी गणेशोत्सवाच्या एक महिना अगोदर मंडळे गणरायाची आगमनाची तयारी करू लागतात. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा वर्गणीला सुरुवात होते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, व्यावसायिक तसेच सामान्य नागरिक सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. गणेशोत्सव मंडळे यंदा वर्गणी घेणार नाहीत. पण कोरोनाबाबत जनजागृती, हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत करणे, आरोग्य शिबिरे असे सामाजिक उपक्रम राबवणार आहेत. अशी माहिती पेठांमधील गणेशोत्सव मंडळांनी 'लोकमत'ला दिली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पा उत्सव संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. तर  पुण्याच्या गणेशोत्सवाची जगभरात प्रशंसा केली जाते. शहरात मध्यवर्ती भागात असंख्य गणेश मंडळे आहेत. मंडळाकडून उत्सवाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदा त्यावर भर दिला जाणार आहे. सर्व समाजाची काळजी घेऊन गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाईल. त्यामुळे वर्गणी घेणारच नाही असे मंडळांनी सांगितले आहे. 

...................................................................आताची परिस्थिती फारच अवघड झाली आहे. लोक चार महिने घरात बसून आहेत. अशा वेळी वर्गणी मागणे योग्य नाही. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वइच्छेने दिलेल्या वर्गणीतून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करू.                                                                                                        बाबा जसवंते,अध्यक्ष, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ.......................... ......... ...........................आमची वस्तीचा भाग संमिश्र आहे. याठिकाणी हातावरचे पोट असणारे, रिक्षावाले, किरकोळ विक्रेते अशी लोक राहतात. आम्ही व्यापारी लोकांकडून यंदा वर्गणी घेणार नाही. पण पुढच्या वर्षीसाठी फक्त व्यापाऱ्यांना पावती देऊन ठेवणार आहोत. म्हणजे पुढच्या वर्षी अडचण येणार नाही. वस्तीत आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचे सातत्याने आवाहन करीत आहोत.                                                      चेतन शिवले , सामाजिक उपक्रम समिती प्रमुख, श्री काळभैरवनाथ तरुण  मंडळ, गणेश पेठ ................................................................सभासदांची इच्छा असेल तर ते वर्गणी देतील. सध्याची परिस्थिती पाहता व्यापारी वर्गाकडे काही मागणार नाही. आम्ही दरवर्षी कसबा पेठेत उत्साहात गणेशोत्सव साजरा करतो. पण यंदा साधेपणाने करणार आहोत. तसेच मंडळाच्या वतीने लोकांना मदत करण्याचे काम चालू आहे.                                                                                                                     सुशांत कर्डे, अध्यक्ष, जनार्दन पवळे संघ, कसबा पेठ ..........................................................यंदा मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संचारबंदीत रेड लाईट भागातील महिलांना धान्याचे किट वाटप केले आहे. व्यापारी किंवा मंडळाचे कार्यकर्ते कोणाकडूनही वर्गणी घेणार नाही. अमृत महोत्सवी वषार्साठी दोन, तीन वर्षांपासून पैसे जमा केले होते. ते सामाजिक उपक्रमासाठी वापरणार आहोत.                                   सारंग माडचेट्टी,अध्यक्ष, तरुण अशोक मंडळ, बुधवार पेठ ................................             ...................कोरोनाकाळात समाजसेवेचा विडा उचलला आहे. गणेशोत्सवातही तेच करणार आहोत. वर्गणी घेण्यापेक्षा मंडळाच्या वतीने समाजाला मदतीचा हात म्हणून उभे राहत आहोत. पुढील महिन्यात स्वइच्छेने वर्गणी आली तर स्वीकारू. त्याही पैशाचा वापर समाजहितासाठी केला जाईल.                                                                          अमित पळसकर , अध्यक्ष, कडबे आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शनिवार पेठ. ........................................................लोकांच्या घरात रेशन नाही. आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्सवाचा मूळ हेतू समाजाला एकत्र आणणे हाच आहे. दरवर्षी आम्ही जास्तीत जास्त सभासद वर्गणीतून उत्सव करतो. पण यंदा कोणाकडेही पैसे मागणार नाही.                                                                                                           प्रशांत मते , अध्यक्ष, सोमवार पेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ..................................................................अजून मंडळाची बैठक झाली नाही. शासनाच्या नियमावलीनुसार आमच्या नियोजनाला सुरुवात होणार आहे. पण वर्गणी न घेता साधेपणाने गणेशोत्सव करण्याचे ठरवले आहे.                                                                                                                                            वैभव रोकडे , जयहिंद मित्र, शनिवार पेठ ......................................................आमच्या  भागात मध्यमवर्गीय लोक राहतात. तसेच व्यापारीवर्ग कमी आहे. दाटवस्तीच्या भागात असणाऱ्या सर्वांची आर्थिक परिस्थिती वाईटच आहे. त्यामुळे घरोघरी व व्यापारी कोणाकडेच वर्गणी न मागण्याचे ठरवले आहे.                                                                                                               - मनोज शिंदे, अभिनव मित्र मंडळ, शिवाजीनगर गावठाण.

 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय