शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

“देशात येत्या २ वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३ कोटींवर जाईल”: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 19:28 IST

१९४७ नंतर चुकीची आर्थिक धोरणे, भ्रष्ट कारभार आणि दूरदृष्टी नसणारे नेतृत्व यामुळे आपले मोठे नुकसान झाले, अशी टीका नितीन गडकरींनी केली.

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून देशात इलेक्ट्रिक वाहनांना मोठी मागणी असल्याचे दिसत आहे. दुचाकीपासून ते अगदी प्रवासी, मालवाहतूक क्षेत्रातील चारचाकींपर्यंत अनेकविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहने देशात मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. पेट्रोल-डिझेलला पर्याय आणि प्रदुषण कमी होण्यासाठी सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यातच आता, देशात आगामी दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ३ कोटींपर्यंत जाईल, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तब्बल १३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात सध्या १२ लाख इलेक्ट्रिक वाहने आहेत. डिसेंबरपर्यंत हा आकडा ४० लाखांपर्यंत जाईल. तर येत्या दोन वर्षात ही संख्या तीन कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात खूप वाव असून या क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे पाठबळ असलेल्या पाच नवउद्यमींच्या (स्टार्टअप) अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

सेमीकंडक्टरसंदर्भात देशात संशोधन व्हायला हवे

सध्या देशात सेमीकंडक्टर तुटवडा आहे. हे सेमिकंडक्टर धुण्याच्या यंत्रापासून चारचाकीपर्यंत सर्वत्र वापरले जाते. त्यामुळे आपल्या ऑटोमोबाइल निर्यातीला फटका बसला आहे. देशात होणारे संशोधन प्रत्येक जिल्हा, प्रदेशाच्या गरजेनुसार झाले पाहिजे. तसेच देशाची भविष्यातील गरज काय, आपण आयात काय करतो आणि काय निर्यात करू शकतो, याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे. त्यादृष्टीने संशोधन झाल्यास आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, असे गडकरी यांनी सांगितले. 

आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांना खूप वाव

विजेवर चालणाऱ्या वाहनांत लागणारी लिथियम आयर्न बॅटरी ऑस्ट्रेलिया, चीन किंवा अर्जेंटिना या देशांतून आयात करावी लागते. मात्र फरिदाबाद येथील इंडियन ऑइलच्या प्रयोगशाळेने पर्यायी ॲल्युमिनियम एअर टेक्नॉलॉजी शोधली आहे. याशिवाय देशात लिथियम आयर्न बॅटरीसोबत झिंक आयर्न, ॲल्युमिनियम आयर्न, सोडियम आयर्न यावरही काम झाले आहे. परिणामी आगामी काळात विजेवर चालणाऱ्या वाहनांना खूप वाव असणार आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पुण्यात दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेस सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली आहे. आपण गरीब लोकसंख्या असलेले समृद्ध राष्ट्र आहोत. १९४७ नंतर चुकीची आर्थिक धोरणे, वाईट आणि भ्रष्ट कारभार आणि अदूरदर्शी नेतृत्व यामुळे आपले मोठे नुकसान झाले. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर भारताची चर्चा करतो, आपण आनंदी, समृद्ध आणि शक्तिशाली भारताची चर्चा करतो, असे गडकरी म्हणाले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरPuneपुणे