शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Supriya Sule: गडकरी साहेब, राज ठाकरे, तज्ञ नेते सांगतायेत राज्याची परिस्थिती अडचणीत; ही चिंतेची बाब - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 17:50 IST

कॅबिनेट मध्ये अनेक वेळा वित्त मंत्रालयाकडून विरोध केला जातो, परंतु कोणीही ऐकत नसून रेटून निर्णय घेतले जातात

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली गेली. आता या योजनेवरूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेल्या एका विधानाने सरकारचीच कोंडी झाली आहे. त्याबाबत सुप्रिया सुळेंनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. गडकरी साहेब, राज ठाकरे आणि काही तज्ञ असे नेते आणि लोक वारंवार महाराष्ट्राच्या परिस्थिती अडचणीत आहे असं सांगत आहे. महाराष्ट्र सरकार मधील लोक असं सांगत असेल तर ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.   

नितीन गडकरी यांनी त्यांच्या शैलीत भाष्य करत सरकारच्या भरवशावर राहू नका, कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी त्यांना दूर ठेवा. सरकार विषकन्या असते ज्याच्यासोबत जाते त्यांना बुडवते. त्यामुळे जे काही अनुदान मिळते ते घेऊन टाका पण कधी मिळेल, केव्हा मिळेल याचा भरवसा नाही. अनुदान मिळेल की नाही माहिती नाही. असे सवाल उपस्थित केले होते. याबाबत सुप्रिया सुळे यांनी सत्तेमध्ये असणाऱ्या गडकरी यांना विचारायला पाहिजे असं मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या,  महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. नितीन गडकरी यांनाच आजची माहिती जास्त असणार. गडकरी साहेब, राज ठाकरे आणि काही तज्ञ असे नेते आणि लोक वारंवार महाराष्ट्राच्या परिस्थिती अडचणीत आहे असं सांगत आहे. महाराष्ट्र सरकार मधील लोक असं सांगत असेल तर ही अतिशय चिंतेची बाब आहे. आमचे जयंत पाटील सातत्याने यावर बोलत होते. पण कोणीही गांभीर्याने घेतलं नाही. कॅबिनेट मध्ये अनेक वेळा वित्त मंत्रालयाकडून विरोध केला जातो. आणि त्याच्यावर कोणी ऐकत नाही. रेटून निर्णय घेतले जातात. जी परिस्थिती आत्ता ऐकायला मिळते त्याला सर्वस्वी ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. प्रचंड गडबड करून ठेवली आहे. उद्घाटन, पब्लिसिटी, पक्ष फोडा, घर फोडा एवढेच काम करत आहे. जेव्हा जयंत पाटील अर्थमंत्री होते तेव्हा हे राज्य सरप्लस राहिलेला आहे. 

धर्मवीर २ बाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही राजकारणात पॉलिसी मेकिंग साठी आलो आहे. सिनेमा हा असलाच पाहिजे सिनेमाही इंडस्ट्री आहे. मनोरंजन म्हणून पाहिला पाहिजे. सिनेमा हे राजकारण होऊ शकत नाही. ही घटना 23 वर्षांपूर्वी झाली आहे. इतक्या वर्ष तुम्ही सत्तेत होता. तुमचे नियत साफ असेल. तर टेलिव्हिजनवर बोलण्यापेक्षा पोलीस कमिशनर कडे गेल पाहिजे. होम मिनिस्टर तुमच्याकडेच आहे  असे म्हणत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.  

हर्षवर्धन पाटील अन् आमचे चांगले संबंध 

काही लोक मलाही भेटले त्यांची इच्छा आहे की तुतारी घेऊन राज्यभरात स्वाभिमान पद्धतीने लढावं. मानसन्मान करून निर्णय घेणारा पक्ष आहे. लोकशाहीने चालणारा हा पक्ष चालतो. हर्षवर्धन पाटील यांना आदराने मी भाऊ म्हणते त्यांच्या आणि आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकांचे आहेत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते संबंध जपले जातील. ते जो काय निर्णय घेतील त्याचा आमच्या कौटुंबिक आणि राजकीय निर्णयाशी काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारNitin Gadkariनितीन गडकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार