शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अमित शहा सहाकार मंत्री झाल्यापासून साखर उद्योगाला चांगले दिवस: निर्मला सीतारामण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 19:49 IST

साखर उद्योगाला चांगले दिवस आले, हे बारामतीत सांगताना मला आनंद...

बारामती : भारत देश जगातील सर्वाधिक मोेठा साखर उत्पादक देश बनला आहे. साखर निर्यातीत देखील आपला देश जगात आघाडीवर आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी निर्णय घेतल्याने साखर उद्योगाला चांगले दिवस आले, हे बारामतीत सांगताना मला आनंद होत आहे. मोदी सरकारने या क्षेत्रात राजकारण केले नाही, तर सहकाराला मंदिर मानून मोदी सरकार काम करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.

बारामती येथे आयोजित सहकार परीषदेत निर्मला सीतारामण बोलत होत्या. यावेळी सीतारामन पुढे म्हणाल्या, देशाच्या विकासात गेल्या शतकापासून सहकाराचे मोठे योगदान आहे. मोदी सरकारने देश पातळीवर सहकारासाठी स्वतंत्र मंत्रालय बनविले, त्यामुळे सहकारातील प्रत्येक समस्या मार्गी लागण्यास मदत झाली. मोदी सरकारने सहकार क्षेत्रासाठी हे मोठे पाऊल विचार करून टाकल्याचे त्या म्हणाल्या.

सहकारात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. मात्र, सहकाराचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग झाल्याने सर्वसामान्य माणूस अधिक अडचणीत आला. सहकाराचा वापर स्व:कल्याणसाठी करणाऱ्यांनी सहकाराकडे दुर्लक्ष केले, त्याचा फटका या क्षेत्रातील सर्वसामान्यांना बसला. देशातील शेती क्षेत्रात पतपुरवठा करणाऱ्या ६३ हजार सोसायट्यांच्या पारदर्शी कारभारासाठी केंद्र सरकारने २ हजार ५१६ कोटींची तरतुद केल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :BaramatiबारामतीAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीSugar factoryसाखर कारखाने