शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एनआयसीच्या बोगस कारभाराचा पुणे जिल्ह्यातील विकासकामांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 16:06 IST

पुणे : जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसह, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या शेकडो कामांची बिले गेल्या पंधार-वीस दिवसांपासून ...

पुणे : जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसह, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या शेकडो कामांची बिले गेल्या पंधार-वीस दिवसांपासून एनआयसीच्या सर्व्हर डाऊन झाल्याने रखडली आहेत. एनआयसीच्या (National Informatics Centre) बोगस कारभाराचा फटका सध्या ग्रामपंचायतींच्या विकास कामांना बसत आहे.

पंधराव्या वित्त आयोगाच्या सर्व कामांची बिले आता ऑनलाईन पध्दतीनुसार काढली जातात. यासाठी शासनाच्या राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्राच्या( NIC) वतीने स्वतंत्र साॅफ्टवेअर विकसित केले आहे. आता पर्यंत एखाद्या बिलाच्या डीएसी ( डिजिटल स्वाक्षरीत- Digital signature) साठी ऑनलाईन दाखल केले तर त्वरीत तीन-चार तासांमध्ये मान्यता मिळत होते. परंतु एनआयसीने सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले असून, यामुळे गेले 15-20 दिवसांपासून बिल काढण्यात अडचण येत आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व वित्त विभागा मार्फत ऑनलाईन बिलांची प्रकिया पूर्ण केली जाते. यामध्ये संबंधित दोन्ही विभाग प्रमुखांची डीएसी मान्य झाल्यानंतरच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष बिलांचे धनादेश अथवा व्हाऊचर काढले जाते. परंतू ऑनलाईन प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर तीन-चार दिवसांचा कालावधी लोटला तरी डीएसी मजूर होत नाही. सध्या मार्च अखेरमुळे दररोज बिलांची संख्या वाढत आहे. यामुळेच वरिष्ठ पातळीवर यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र