शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

पुढील दोन आठवड्यात पाऊस सामान्य, विदर्भावरील पाणी संकट कायम, मध्य महाराष्ट्र पाणीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 22:31 IST

बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील दोन आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने देशभरातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुणे, दि. 21 -  बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील दोन आठवड्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने देशभरातील पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच, पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.  विदर्भात यंदा आतापर्यंत २३ टक्के पाऊस कमी झाला असून तेथे पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा अंदाज गुरुवारी जाहीर केला. १५ ते २१ सप्टेंबर या आठवड्यात देशभरात सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला असला तरी देशाच्या ११ विभागात ६० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. त्याचवेळी विदर्भात (७६ टक्के), मराठवाड्यात (३५ टक्के), मध्य महाराष्ट्रात (१३४ टक्के) आणि कोकणात (४१० टक्के) अधिक पाऊस झाला. 

पुढील आठवड्यात तामिळनाडू आणि कर्नाटकात काही दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील संपूर्ण आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवसात तुरळक ठिकाणी तर त्यानंतर दोन दिवस अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही २३ सप्टेंबरपासून तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

१ जूनपासून २० सप्टेंबरपर्यंत झालेला पाऊस (मिमी)

विभागप्रत्यक्षसरासरीफरक
कोकण३०६०२८०९़५
मध्य महाराष्ट्र८०१़९६६९़९२०
मराठवाडा६१२़२६२८़५-३
विदर्भ६९९़१९१३़५-२३

 

 

टॅग्स :Puneपुणे