शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पुणे शहरात पुढील ६ दिवस असणार पावसाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:51 IST

पाऊस पाहून उमेदवारांना करावे लागणार नियोजन

ठळक मुद्देमतदानासाठी राहिले १३ दिवस  रविवारी अनेकांनी पाऊस आल्यावर आपल्या पदयात्रा थांबविल्या़. 

पुणे : ऑक्टोबर महिना सुरू झाला असला, तरी अद्याप पावसाळा संपलेला नाही़. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, उरलेल्या १३ दिवसांत जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उमेदवारांच्या मनसुभ्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे़. रविवारच्या सुट्टीचे निमित्त साधून मतदारसंघातील अधिकाधिक भागात संपर्क साधण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला़. त्यासाठी काही उमेदवारांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते, तर काही उमेदवार पदयात्रा करीत होते़. त्याचवेळी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली़. काही जणांनी भर पावसात रॅली तशीच पुढे नेली, तर काही उमेदवार पदयात्रा थांबवून आडोशाला जाऊन पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले़. पुणे शहरात गेल्या चार महिन्यांत भरभरून पाऊस झाला़. आता थोडा जरी पाऊस पडला, तरी रस्त्यांवर तळी साचू लागली आहेत़. त्यात परतीचा हा पाऊस अचानक इतका जोरदार पडतो की नुसता रस्ता ओलांडायचा म्हटले तरी, तोपर्यंत माणूस संपूर्ण भिजून जातो़. शनिवारी सायंकाळी अनेकांनी पदयात्रांचे आयोजन केले होते; पण चार वाजण्याच्या सुमारास पावसाची जोरदार सर आली़. त्यामुळे पदयात्रा सुरू करण्यात अनेक उमेदवारांना उशीर झाला होता़ रविवारी दुपारीही तासभर जोरदार पाऊस झाला होता़. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात १४ मिमी पावसाची नोंद झाली होती़. राजस्थानमधून परतीचा पाऊस सुरू झाला नसला, तरी हा परतीच्या पावसासारखाच पाऊस पडत आहे़. सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढगांची गर्दी होते आणि थोड्या वेळात जोरदार पाऊस पडतो़. तास, दोनतास झोडपून काढल्यानंतर तो थांबतो़. तोपर्यंत शहरातील रस्त्यांचे तळे झालेले असतात़ अशा पावसात उमेदवारांना प्रचाराला जाण्याची सोय उरत नाही़. रस्त्यावर तळी साचलेली असताना आपण प्रचाराला गेलो, तर मतदारांच्या रागाला तोंड द्यावे लागेल अशी उमेदवारांना भीती वाटते़. त्यामुळे रविवारी अनेकांनी पाऊस आल्यावर आपल्या पदयात्रा थांबविल्या़. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसElectionनिवडणूक