शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महापालिकेच्या पाणी प्रश्नावर न्यायालयात नवीन याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 20:37 IST

गेल्या दोन महिन्यापासून न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे.

ठळक मुद्दे पुणे महापालिकेला वर्षाला १८ टीएमसी पाणी पिण्यासाठी द्यावे, अशी याचिका येत्या ३० एप्रिलपर्यंत कागदपत्र प्राप्त न झाल्यास न्यायालयाकडून पुढील सुनावणी घेतली जाणार

पुणे : महापालिकेच्या पाणी प्रश्नावर पुण्यातील १० व्यक्तींनी नवीन जनहित याचिता उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे सध्या न्यायालयात सुरू असलेल्या पालिकेच्या पाणी प्रश्नावरील सुनावणी बुधवारी होऊ शकली नाही. परंतु, आता दोन्ही याचिकांवर संयुक्तपणे सुणावणी घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, पुढील सुनावणी येत्या ३० एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायलयाने स्पष्ट केले.पुणे महापालिकेकडून अधिकचे पाणी वापरले जात असल्यामुळे ग्रामीण भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी मिळत नसल्याचा दावा करत इंदापूरातील प्रताप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. गेल्या दोन महिन्यापासून न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू आहे. परंतु, जलसंपदा विभागाने न्यायालयासमोर आपले म्हणणे सादर केले आहे. मागील सुनावणीत शासनाने आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे,असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान पुणे महापालिकेला वर्षाला १८ टीएमसी पाणी पिण्यासाठी द्यावे, अशी याचिका उच्च न्यायायलयाचे मुख्य न्यायाधिश यांच्याकडे दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे बुधवारी दोन महिन्यापासून सुरू असलेल्या प्रताप पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही.सध्या सुरू असलेल्या सुनावणीचा विषय आणि नव्याने दाखल झालेली याचिका यांचे विषय एकच असल्याने दोन्ही याचिकाकर्त्यांची सुनावणी एकाच ठिकाणी संयुक्तपणे घ्यावी, अशी माहिती समोर आली. मात्र, अद्याप याबाबतचे अधिकृत कागदपत्र न्यायालयासमोर आलेले नाहीत.त्यामुळे येत्या ३० एप्रिलपर्यंत कागदपत्र प्राप्त न झाल्यास न्यायालयाकडून पुढील सुनावणी घेतली जाणार आहे, असे प्रताप पाटील यांचे वकिल शकुंतला वाडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी