शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

येत्या तीन वर्षात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नवे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 20:50 IST

वाकडेवाडी, आंबिल ओढा, राजेंद्रनगर, घोरपडे पेठ येथील वसाहतींचा विचार केला जाणार

ठळक मुद्देधोकादायक इमारती : ७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार शासनाच्या निर्णयानुसार २८५ चौरस फुटांचे घर देण्याचा विचार सुरु प्रत्येक वसाहतीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत इमारती बांधून स्थलांतर करण्यात येणार

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमधील धोकादायक इमारतींच्या बीओटीद्वारे होणाऱ्या पुनर्विकासाला रहिवाशांसह स्थानिक नगरसेवकांनी कडाडून विरोध केल्यानंतर प्रशासनाने स्वत:च कर्मचाऱ्यांच्या इमारती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुनर्विकासाबाबत अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी अतिरीक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. या पुनर्विकासासाठी ७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासनाने तयार केले असून वाकडेवाडी, आंबिल ओढा, राजेंद्रनगर, घोरपडे पेठ येथील वसाहतींचा विचार केला जाणार आहे.         समितीचे गठन झाल्यावर पुनर्विकासाबाबत तयार केलेला अहवाल आयुक्त आणि महापौरांना सादर करण्यात आला होता. आचारसंहिता लागल्याने याविषयावर पुढे फारशी कार्यवाही होऊ शकली नाही. यापुर्वी झालेल्या ‘बांधा वापरा हस्तांतरीत करा’ (बीओटी) करारनाम्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल मागविण्यात आलेला होता. तसेच १७ जुलै रोजी या वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत महापौरांनी बैठक घेतली होती. या बैठकीला पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेतील पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, पालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार समितीची स्थापना करण्यात आली. पालिका कर्मचाऱ्यांनी बीओटी तत्वावर या इमारती विकसित न करता मालकी हक्काने द्याव्यात अथवा पालिकेने स्वत: विकसीत कराव्यात अशी आग्रही मागणी  केलेली होती. भवन व मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून यापुर्वी राबविल्या गेलेल्या निविदा प्रक्रियेची माहिती घेऊन या निविदांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करुन तसेच वसाहतींच्या पुनर्निर्माणासाठी धोरण निश्चित करण्यात आले होते. वसाहती अन्य विकसकाला पुनर्निर्माणासाठी देण्यापेक्षा पालिकेनेच या वसाहती पुन्हा बांधल्या तर किती खर्च येऊ शकेल याचा अभ्यासपूर्ण अहवाल बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आला होता. हा अहवाल अतिरीक्त आयुक्तांमार्फत आयुक्तांना सादर करण्यात आला. त्यानंतर महापौरांना हा अहवाल सादर करण्यात आला. परंतू, त्यावर आचारसंहितेपुर्वी कार्यवाही झाली नाही. विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने याविषयी आता धोरणात्मक निर्णय घेता आला नाही. प्रशासनाने पालिकेनेच कर्मचाऱ्यांच्या वसाहती नव्याने बांधाव्यात असा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करुन घेतली जाणार आहे. भवन विभागाने या प्रकल्पासाठी तुर्तास ७० कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. ====  पालिकेने बीओटीची निविदा काढली तेव्हा कर्मचाऱ्यांना ४५० चौरस फुटांचे घर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतू, आता पालिकाच पुनर्विकास करणार असल्याने शासनाच्या निर्णयानुसार २८५ चौरस फुटांचे घर देण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे कर्मचाºयांना नवे घर मिळणार असले तरी सदनिकेचा आकार मात्र कमी होणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार खोलीभाडे सुद्धा वाढणार आहे. या पुनर्विकासासाठी तीन वर्षांचा कालावधी गृहीत धरण्यात आला असून प्रत्येक वसाहतीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत इमारती बांधून स्थलांतर करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारHomeघर