शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

‘परिवर्तन’ महोत्सवातील तरूणांमध्ये नवी उमेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 20:45 IST

जळगावचाा महोत्सव पुण्यात

ठळक मुद्देमहोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक आदानप्रदानात सकारात्मक पायंडा निर्माण जळगावचा 'परिवर्तन' हा कला महोत्सव पुण्यात ज्योत्स्ना भोळे सभागृहात 3 ते 5 जानेवारीलापहिल्या दिवसाच्या या वैचारिक अभिवाचनाने सर्वच रसिकांना केले अंतर्मुख खान्देशच्या सांस्कृतिक क्षेत्राला बळ 

पुणे : सांस्कृतिक क्षेत्रात आज अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आजूबाजूची सांस्कृतिक उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. नैराश्याचे वातावरण पहायला मिळत असताना 'परिवर्तन' सारखे  आशेचे किरण दिलासा देणारे ठरतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक आदानप्रदानात सकारात्मक पायंडा निर्माण केला आहे, असा आशावाद बुधवारी 'परिवर्तन महोत्सवा'दरम्यान व्यक्त करण्यात आला. सांस्कृतिक महोत्सव तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण करतात, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.जळगावचा 'परिवर्तन' हा कला महोत्सव पुण्यात ज्योत्स्ना भोळे सभागृहात 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी, ३ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. जळगाव येथील परिवर्तन संस्थेतर्फे, नाटकघर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या सहकार्याने पुण्यात कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रंगांच्या फटकाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी ‘लोकमत समूह’ संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, रंगकर्मी नंदू माधव, अतुल पेठे, शुभांगी दामले, राष्ट्रसेवादलाचे गोपाळ नेवे, मंजूषा भिडे, हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . कँन्हव्हास वर रंगाचे फटकारे मारून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शिरिष बर्वे, सोनाली पाटील, हर्षदा कोल्हटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले . पहिल्या दिवशी शंभु पाटील लिखित व दिग्दर्शित 'गांधी नाकारायचाय ..पण कसा ?' हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील व विजय जैन या कलावंतानी सादर केले. राहुल निंबाळकर यांनी प्रकाशयोजना, तर पार्श्वसंगीत वसंत गायकवाड यांचे होते. पहिल्या दिवसाच्या या वैचारिक अभिवाचनाने सर्वच रसिकांना अंतर्मुख केले. शनिवारी 'अमृता, साहिर, इमरोज' हे नाटक, तर 'नली' या एकल नाट्याची रसिकांनी अनुभूती घेतली. संकल्पना राहुल निंबाळकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे होते. जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील या कलावंतांनी याचे सादरीकरण केले. निर्मिती प्रमुख अंजली पाटील व चंद्रकांत इंगळे होते.----खान्देशच्या सांस्कृतिक क्षेत्राला बळ परिवर्तन या संस्थेने आपल्या परिवर्तनशील उपक्रमांमधून जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. 'परिवर्तन' निर्मित कलाकृती व कलावंत यांचे कार्यक्रम आता पुण्या, मुंबई येथे नियमितपणे आयोजित केले जात आहेत. खान्देशामधील संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे, हे पहिल्यांदा घडत आहे . खान्देशामधील सांस्कृतिक क्षेत्राला बळ देणारी ही गोष्ट आहे . 

टॅग्स :PuneपुणेJalgaonजळगावartकलाcultureसांस्कृतिक