शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवर्तन’ महोत्सवातील तरूणांमध्ये नवी उमेद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 20:45 IST

जळगावचाा महोत्सव पुण्यात

ठळक मुद्देमहोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक आदानप्रदानात सकारात्मक पायंडा निर्माण जळगावचा 'परिवर्तन' हा कला महोत्सव पुण्यात ज्योत्स्ना भोळे सभागृहात 3 ते 5 जानेवारीलापहिल्या दिवसाच्या या वैचारिक अभिवाचनाने सर्वच रसिकांना केले अंतर्मुख खान्देशच्या सांस्कृतिक क्षेत्राला बळ 

पुणे : सांस्कृतिक क्षेत्रात आज अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आजूबाजूची सांस्कृतिक उदासीनता अस्वस्थ करणारी आहे. नैराश्याचे वातावरण पहायला मिळत असताना 'परिवर्तन' सारखे  आशेचे किरण दिलासा देणारे ठरतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक आदानप्रदानात सकारात्मक पायंडा निर्माण केला आहे, असा आशावाद बुधवारी 'परिवर्तन महोत्सवा'दरम्यान व्यक्त करण्यात आला. सांस्कृतिक महोत्सव तरुणांमध्ये नवी उमेद निर्माण करतात, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.जळगावचा 'परिवर्तन' हा कला महोत्सव पुण्यात ज्योत्स्ना भोळे सभागृहात 3 ते 5 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी, ३ जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन झाले. जळगाव येथील परिवर्तन संस्थेतर्फे, नाटकघर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या सहकार्याने पुण्यात कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रंगांच्या फटकाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी ‘लोकमत समूह’ संपादक विजय बाविस्कर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, रंगकर्मी नंदू माधव, अतुल पेठे, शुभांगी दामले, राष्ट्रसेवादलाचे गोपाळ नेवे, मंजूषा भिडे, हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते . कँन्हव्हास वर रंगाचे फटकारे मारून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शिरिष बर्वे, सोनाली पाटील, हर्षदा कोल्हटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले . पहिल्या दिवशी शंभु पाटील लिखित व दिग्दर्शित 'गांधी नाकारायचाय ..पण कसा ?' हे अभिवाचन नारायण बाविस्कर, मंजूषा भिडे, होरीलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, हर्षल पाटील व विजय जैन या कलावंतानी सादर केले. राहुल निंबाळकर यांनी प्रकाशयोजना, तर पार्श्वसंगीत वसंत गायकवाड यांचे होते. पहिल्या दिवसाच्या या वैचारिक अभिवाचनाने सर्वच रसिकांना अंतर्मुख केले. शनिवारी 'अमृता, साहिर, इमरोज' हे नाटक, तर 'नली' या एकल नाट्याची रसिकांनी अनुभूती घेतली. संकल्पना राहुल निंबाळकर यांची तर दिग्दर्शन मंजूषा भिडे यांचे होते. जयश्री पाटील, हर्षदा कोल्हटकर आणि शंभू पाटील या कलावंतांनी याचे सादरीकरण केले. निर्मिती प्रमुख अंजली पाटील व चंद्रकांत इंगळे होते.----खान्देशच्या सांस्कृतिक क्षेत्राला बळ परिवर्तन या संस्थेने आपल्या परिवर्तनशील उपक्रमांमधून जळगावचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले आहे. 'परिवर्तन' निर्मित कलाकृती व कलावंत यांचे कार्यक्रम आता पुण्या, मुंबई येथे नियमितपणे आयोजित केले जात आहेत. खान्देशामधील संस्थेचा महोत्सव पुण्यात होतो आहे, हे पहिल्यांदा घडत आहे . खान्देशामधील सांस्कृतिक क्षेत्राला बळ देणारी ही गोष्ट आहे . 

टॅग्स :PuneपुणेJalgaonजळगावartकलाcultureसांस्कृतिक