शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

नवे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांचे पुण्याबरोबर जुने ऋणानुबंध...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 13:49 IST

जोगेश्वरीच्या बोळात स्वतःचा वाडा : धनजंय चंद्रचूड यांचा जन्म पुण्यातलाच

राजू इनामदार

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत हे पद गुणवत्तेवर मिळवले. या चंद्रचूड परिवाराचा पुणे जिल्हा आणि पुणे शहराशी जवळचा ऋणानुबंध आहे. पुण्यात जोगेश्वरीच्या बोळात चंद्रचूड यांचा एक वाडाच असल्याचे जुन्या पिढीतील लोक सांगतात. त्याशिवाय त्यांचे मूळ गाव असलेले कनेरसर (ता. खेड) येथील वाडा तर अजूनही आपले अस्तित्व ठेवून आहे.

यशवंतराव चंद्रचूड नूतन मराठी विद्यालयाचे विद्यार्थी. पुढे शिक्षण घेत ते प्रथम उच्च न्यायालयाचे व नंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. आता त्यांचेच चिरंजीव असलेले धनंजयराव यांनीही तेच पद मिळवले आहे. या परिवाराबरोबर जुन्या काळात निकटचा स्नेह असलेले त्यावेळचे शालेय विद्यार्थी प्रा. प्रकाश भोंडे चंद्रचूड यांच्या त्या वाड्यात जात असत. धनंजय यांचा जन्म पुण्यातलाच, असे ते म्हणाले. यशवंतराव उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्याने त्यांच्याबरोबर वागता-बोलताना सर्वजण शिष्टाचार पाळून बोलत असत, असे त्यांनी सांगितले.

पुढे यशवंतराव सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्याने त्यांचा पुण्यातील संपर्क तुटला. तो वाडाही काळाच्या ओघात अस्तंगत झाला, मात्र, यशवंतराव त्या काळात अधूनमधून पुण्याला भेट देत असत. विद्या सहकारी या बीएमसीसीतील प्राध्यापक मंडळींनी स्थापन केलेल्या बँकेला भेट देण्यासाठी एकदा त्यांना बोलावले होते. न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ते निमंत्रण मान्य केले. १९८५ मध्ये त्यांनी सहपरिवार बँकेच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी धनंजयराव उपस्थित होते, असे प्रा. भोंडे म्हणाले.

यशवंतराव आधी मुंबईत व नंतर दिल्लीत गेल्यामुळे धनंजयरावांचाही पुणे शहराशी फारसा संपर्क राहिला नाही. नंतरच्या काळात तेही मोठ्या पदावर गेल्यामुळे त्यांच्याबाबतीतही शिष्टाचार पाळण्याचा प्रश्न उपस्थित झाला व संपर्क तुटला, असे प्रा. भोंडे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर येथील वाड्यात चंद्रचूड यांचे नातेवाईक आजही राहतात. सुनंदा चंद्रचूड यांनी सांगितले की, २०१७ मध्ये धनंजयराव चंद्रचूड यांनी कनेरसर गावास व त्यांच्या वाड्यास भेट दिली होती. गावकऱ्यांना यशवंतराव व धनंजयराव या पिता-पुत्रांविषयी चांगलाच अभिमान आहे.

राज्यात सर्वप्रथम येण्याची हॅट्ट्रिक

गावातील काहीजणांनी सांगितले की, यशवंतरावांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे सन १९१२ मध्ये त्यावेळच्या एलएल.बी.च्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आले होते. त्यांच्यानंतर यशवंतराव सन १९४२ मध्ये व नंतर त्यांची मुलगी १९७१ मध्ये याच परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती. पितापुत्र सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होण्याबरोबरच राज्यात एलएल.बी. परीक्षेत सर्वप्रथम येण्याची हॅट्ट्रिक चंद्रचूड परिवाराच्या नावावर असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयSocialसामाजिकadvocateवकिल