शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दी वर्षात महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवा अध्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 18:39 IST

दोन्ही राज्यातील कवी, नेते,लेखक, आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसरहद संस्थेचा पुढाकार : मराठी, बंगाली भाषेतील ५० पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : स्वातंत्र्यलढ्यात पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. लाल (लाला लाजपत राय), बाल (लोकमान्य बाळ गंगाधर टिळक) आणि पाल (बिपिन चंद्र पाल) यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इतिहास घडवला. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र-पंजाब संबंध अधिक दृढ झाले असले तरी महाराष्ट्र-बंगाल संबंध अधिक विकसित होऊ शकलेले नाहीत. हे संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त महाराष्ट्र-बंगाल मैत्रीचा नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरहदचे संस्थापक-अध्यक्ष संजय नहार म्हणाले, 'भाषा, साहित्य, कला, नाट्य, चित्रपट, शिक्षण, संस्कृती या क्षेत्रातील मान्यवरांच्या वैयक्तिक लोक-लोक संपर्कांवर या वर्षी भर दिला जाणार आहे.  दोनही राज्यांत विविध कार्यक्रम आयोजित करून लोक चळवळ सुरू केली जाईल. त्यासाठी दोन्ही राज्यातील लेखक, कवी, नेते आणि कलाकार यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. आम्ही पंजाबी, बंगाली आणि मराठी भाषेतून सुमारे ५० पुस्तकांचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.'

…..............

ममता बॅनर्जी, कॅप्टन अमरिंदरसिंग, उद्धव ठाकरे या तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह लाला लाजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांचे वंशज अनुक्रमे अ‍ॅड. अनिल अग्रवाल, शैलेश आणि डॉ. दीपक टिळक आणि दीप पाल यांची उपस्थिती असणार आहे. या काळात तीन स्वातंत्र्यसैनिकांचे वंशजही विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. १ ऑगस्ट रोजी हा कार्यक्रम सुरू होईल आणि योगी श्री अरबिंदो घोष यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 15 ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाwest bengalपश्चिम बंगालMaharashtraमहाराष्ट्रliteratureसाहित्य