शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

राहूल गांधींना ना त्यांचा पक्ष गंभीरपणे घेतो ना जनता; देवेंद्र फडणवीसांची टीका

By राजू इनामदार | Updated: November 22, 2023 17:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती त्यांनाच वाटते जे भ्रष्टाचारी व दुराचारी आहेत

पुणे: राहूल गांधी यांना ना त्याचा पक्ष गंभीरपणे घेत ना जनता. मग मी तरी कशाला त्यांचा विचार करू? अशा तिखट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिती त्यांनाच आहे जे भ्रष्टाचारी आहेत, दुराचारी आहेत. तेच बोलत असतात असे ते म्हणाले.

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बागेश्वरी धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग व प्रवचनांचे संगमवाडीमध्ये आयोजन केले होते. तीन दिवसाच्या या संत्सगाचा फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी समारोप झाला. तिथे जाण्यापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना फ़डणवीस यांनी राहूल यांना लक्ष्य केले. विश्वचषकात भारताचा पराभव झाल्याबद्दल बोलताना राहूल गांधी यांनी पंतप्रधानांसाठी अवमानकारक शब्द वापरला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधान हे देशातील गरीब जनेतेचे मसिहा आहेत. ते त्यांच्यासाठीच काम करतात. पंतप्रधानांची भिती त्यांनाच वाटते जे भ्रष्टाचारी व दुराचारी आहेत.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा प्रशिक्षण वर्ग झाला, त्यात फडणवीस यांनी त्यांना व्याख्यान दिले. काय सांगितले त्यामध्ये असे विचारले असता फडणवीस म्हणाले, सन २०२४ ते सन २०२९ हा कार्यकाल नरेंद्र मोदींचाच असणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी नाही तर भारतासाठी महत्वाची आहे. जिथे आमचे लोक असतील तिथे आमचे मित्रपक्ष त्यांच्यासाठी काम करतील, त्यांना ताकद देतील. जिथे मित्रपक्षाचे लोक असतील तिथे आम्ही त्यांना शक्ती देऊ असे ठरले आहे तेच तिथेही सांगितले आहे. त्यामुळे निवडणुकीत आमच्यात व मित्रपक्षात कोणतेही मतभेद होणार नाहीत.

राज्यात अनेक ठिकाणी कुणबी नोंदी सापडत आहेत, त्याचे काय करणार यावर बोलताना फडणवीस यांनी त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, व जे माहिती नाही त्यावर बोलणार नाही असे उत्तर दिले. माहिती घेऊ व नंतरच यावर बोलू असे ते म्हणाले. कार्तिकी एकादशीला विठ्ठलाकडे काय मागणार याबाबत उद्या बोलू असे सांगत त्यांनी यावर काहीही उत्तर देणे टाळले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस