शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

राहूल गांधींना ना त्यांचा पक्ष गंभीरपणे घेतो ना जनता; देवेंद्र फडणवीसांची टीका

By राजू इनामदार | Updated: November 22, 2023 17:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती त्यांनाच वाटते जे भ्रष्टाचारी व दुराचारी आहेत

पुणे: राहूल गांधी यांना ना त्याचा पक्ष गंभीरपणे घेत ना जनता. मग मी तरी कशाला त्यांचा विचार करू? अशा तिखट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिती त्यांनाच आहे जे भ्रष्टाचारी आहेत, दुराचारी आहेत. तेच बोलत असतात असे ते म्हणाले.

भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बागेश्वरी धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या सत्संग व प्रवचनांचे संगमवाडीमध्ये आयोजन केले होते. तीन दिवसाच्या या संत्सगाचा फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी समारोप झाला. तिथे जाण्यापूर्वी पत्रकारांबरोबर बोलताना फ़डणवीस यांनी राहूल यांना लक्ष्य केले. विश्वचषकात भारताचा पराभव झाल्याबद्दल बोलताना राहूल गांधी यांनी पंतप्रधानांसाठी अवमानकारक शब्द वापरला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, पंतप्रधान हे देशातील गरीब जनेतेचे मसिहा आहेत. ते त्यांच्यासाठीच काम करतात. पंतप्रधानांची भिती त्यांनाच वाटते जे भ्रष्टाचारी व दुराचारी आहेत.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा प्रशिक्षण वर्ग झाला, त्यात फडणवीस यांनी त्यांना व्याख्यान दिले. काय सांगितले त्यामध्ये असे विचारले असता फडणवीस म्हणाले, सन २०२४ ते सन २०२९ हा कार्यकाल नरेंद्र मोदींचाच असणार आहे. ही निवडणूक भाजपसाठी नाही तर भारतासाठी महत्वाची आहे. जिथे आमचे लोक असतील तिथे आमचे मित्रपक्ष त्यांच्यासाठी काम करतील, त्यांना ताकद देतील. जिथे मित्रपक्षाचे लोक असतील तिथे आम्ही त्यांना शक्ती देऊ असे ठरले आहे तेच तिथेही सांगितले आहे. त्यामुळे निवडणुकीत आमच्यात व मित्रपक्षात कोणतेही मतभेद होणार नाहीत.

राज्यात अनेक ठिकाणी कुणबी नोंदी सापडत आहेत, त्याचे काय करणार यावर बोलताना फडणवीस यांनी त्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, व जे माहिती नाही त्यावर बोलणार नाही असे उत्तर दिले. माहिती घेऊ व नंतरच यावर बोलू असे ते म्हणाले. कार्तिकी एकादशीला विठ्ठलाकडे काय मागणार याबाबत उद्या बोलू असे सांगत त्यांनी यावर काहीही उत्तर देणे टाळले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस