शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या नव्या विशेष रेल्वे गाड्यांमध्येही पुणे-मुंबईकडे 'कानाडोळा'; प्रवाशांची निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 12:13 IST

महाराष्ट्रातूनही केवळ मुंबई-मनमाड, परभणी- हैद्राबाद आणि सोलापुर-म्हैसुर या तीनच गाडयांना हिरवा कंदील

ठळक मुद्देसध्या पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाण्यासाठी नाही एकही रेल्वेगाडी

पुणे : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशभरात ८० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या यादीत पुणे-मुंबई मार्गावर इंटरसिटी गाड्यांकडे कानाडोळा करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातूनही केवळ मुंबई-मनमाड, परभणी- हैद्राबाद आणि सोलापुर-म्हैसुर या तीनच गाडयांना हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांची निराशा झाली आहे.कोरोना संकटामुळे देशातील रेल्वेगाड्या लॉकडाऊनच्या काळात बंद होत्या. अनलॉकमध्ये दि. १ जूनपासून देशभरात २३० विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्यामध्ये पुण्याच्या वाट्याला पुणे-दानापुर एक्सप्रेस ही एकमेव गाडी आली. तर मुंबईतून धावणाऱ्या तीन आणि गोवा एक्सप्रेस या गाड्या पुणेमार्गे धावत आहेत. पुण्यातून मुंबईला दररोज शेकडो प्रवासी दररोज जातात. सध्या शिवनेरी बससेवा सुरू केली असली तरी तिकीट दर परवडत नसल्याने अनेकांनी खासगी वाहनांना पसंती दिली आहे. राज्यात आता आंतरजिल्हा प्रवासावरील बंदीही उठविली आहे. रेल्वेतूनही आंतरजिल्हा तिकीट उपलब्ध होत आहे. त्यामुळे एखादी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी होत आहे. रेल्वे मंत्रालयाने ८० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात पुणे-मुंबईला एखादी गाडी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुणेकरांच्या पदरी निराशा पडली आहे.नवीन ८० विशेष गाड्यांमध्ये मुंबई-मनमाड एक्सप्रेस, सोलापुर-म्हैसुर एक्सप्रेस आणि परभणी-हैद्राबाद एक्सप्रेस या तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. तीनही गाड्या दररोज धावणार आहेत. सध्या पुण्यातून मराठवाडा, विदर्भात जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी नाही. तसेच एसटीनेही मर्यादीत स्वरूपात बससेवा सुरू केली आहे. पण अनेकजण लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. या भागासाठी एकही गाडी नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.----------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेpassengerप्रवासीcentral railwayमध्य रेल्वे