शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आॅनलाइन सुविधेचा उडाला बोजवारा, कर्जमाफीच्या सुविधेला मुकावे लागणार? मुदतवाढ देण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:09 IST

भोर : कर्जदार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र पुरेशा प्रमाणात अर्ज न भरल्याने ती मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८२ कर्जदार शेतक-यांपैकी ९०२९ शेतक-यांचे अर्ज भरले आहेत. त्यामधील ७५१४ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज पूर्णपणे भरुन झाले आहेत. मात्र वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ...

भोर : कर्जदार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र पुरेशा प्रमाणात अर्ज न भरल्याने ती मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८२ कर्जदार शेतक-यांपैकी ९०२९ शेतक-यांचे अर्ज भरले आहेत. त्यामधील ७५१४ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज पूर्णपणे भरुन झाले आहेत. मात्र वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सुविधांचा अभाव यामुळे शिवाय कागदपत्रे नसणारे, वृद्ध अपंग हातांचे ठसे जुळत नाहीत, बाहेरगावी राहतात असे सुमारे एक हजार शेतकरी शासनाच्या कर्जमाफीला मूकणार आहेत.शासनाने राज्यातील २०१६ पर्यंत दीड लाख रु. थकि त कर्ज असलेल्या शेतक-यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला. तर नियमित कर्ज फेडणाºयांना २५ टक्के कर्जमाफी मिळणार आहे. मात्र दीड लाखांपेक्षा अधिक क र्ज असल्यास ते भरल्यावरच बाकीची कर्जमाफी होणार आहे. शेतकºयांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आॅनलाईन महिती भरायची असून त्यासाठी आधार कार्ड, कर्जखाते क्रमांक, मोबाईल नंबर व इतर पुरावे केंद्रात द्यावयाचे आहेत. मात्र आॅनलाईनचा उडालेला बोजवारा यामुळे दिवसभर रांगा लावून बसावे लागत आहे.भोर तालुका हा दुर्गम डोंगरी असून तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी अशिक्षित आहेत. त्यामुळे आॅनलाईन सेवा काय असते, अर्ज कसा भरायचा, याबाबत काहीच महिती नाही. शिवाय आॅनलाईन सेवा अत्यंत सथ गतीने सुरूअसून अनेकदा बंदच असते. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सुमारे ५० ते ६० किलोमीटर अंतरावरुन २०० रुपये खर्च करुन आलेल्या शेतकºयाचा अर्ज भरला गेला नाही, तर त्याला पुन्हा यावे लागत असल्याने विनाकारण भुर्दंड बसत आहेत. जिल्हा बँक व तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव यांनी शेतकºयांना कर्जमाफीबद्दल महिती देऊन शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाहीत. शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या कर्ज माफीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून अनेक शेतकरी कामानिमित्त पुणे मुंबईला राहतात. हातांचे ठसे जुळत नाहीत, कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सुमारे एक हजार शेतकरी कर्जमाफीला मूकणार असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्यातील अल्पभूधारक (५ एकरच्या आत) असलेल्या ६७१९ शेतकरी सभासदांनी सुमारे ३४ कोटी ८९ लाख रुपये वेगवेगळ््या पिकांसाठी पिक कर्ज घेतले होते.भोर तालुक्यात १९७ गावांत खरीप व रब्बी पिकांसाठी ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा बँकेचे सुमारे २२ हजार ७४२ सभासद आहेत. त्यांना दरवर्षी सुमारे ३ लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्ज व मध्यम मुदतीचे बिनव्याजी कर्ज वाटप केले जाते. यावर्षी भोर तालुक्यातील ११ हजार ४४७ शेतकरी सभासांनी सुमारे ४५ कोटी ३२ लाखांचे कर्ज थकवले आहे. मात्र सुमारे ८०३६ सभासदांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतलेले सुमारे ५१ कोटीचे पीककर्ज ३१/३/२०१७ रोजी वेळेत भरलेले आहे. त्यांना कर्जाचे २५ टक्के माफी मिळणार आहे.शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरुन माहिती द्यायची आहे. याबाबत शेतकºयांना माहिती नसून अनेक शेतकरी अशिक्षित आहेत. त्यामुळे शेतकºयांत संभ्रमावस्था आहेत. अनेक शेतकरी आजारी आहेत. कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मुदतवाढ करणे गरजेचे आहे.- सुरेश राजिवडे, शेतकरी, म्हसर खुर्द

टॅग्स :Farmerशेतकरी