शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

आॅनलाइन सुविधेचा उडाला बोजवारा, कर्जमाफीच्या सुविधेला मुकावे लागणार? मुदतवाढ देण्याची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 02:09 IST

भोर : कर्जदार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र पुरेशा प्रमाणात अर्ज न भरल्याने ती मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८२ कर्जदार शेतक-यांपैकी ९०२९ शेतक-यांचे अर्ज भरले आहेत. त्यामधील ७५१४ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज पूर्णपणे भरुन झाले आहेत. मात्र वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा ...

भोर : कर्जदार शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबर होती. मात्र पुरेशा प्रमाणात अर्ज न भरल्याने ती मुदत २२ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत ११ हजार ५८२ कर्जदार शेतक-यांपैकी ९०२९ शेतक-यांचे अर्ज भरले आहेत. त्यामधील ७५१४ शेतक-यांनी आॅनलाईन अर्ज पूर्णपणे भरुन झाले आहेत. मात्र वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सुविधांचा अभाव यामुळे शिवाय कागदपत्रे नसणारे, वृद्ध अपंग हातांचे ठसे जुळत नाहीत, बाहेरगावी राहतात असे सुमारे एक हजार शेतकरी शासनाच्या कर्जमाफीला मूकणार आहेत.शासनाने राज्यातील २०१६ पर्यंत दीड लाख रु. थकि त कर्ज असलेल्या शेतक-यांना कर्ज माफी देण्याचा निर्णय घेतला. तर नियमित कर्ज फेडणाºयांना २५ टक्के कर्जमाफी मिळणार आहे. मात्र दीड लाखांपेक्षा अधिक क र्ज असल्यास ते भरल्यावरच बाकीची कर्जमाफी होणार आहे. शेतकºयांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आॅनलाईन महिती भरायची असून त्यासाठी आधार कार्ड, कर्जखाते क्रमांक, मोबाईल नंबर व इतर पुरावे केंद्रात द्यावयाचे आहेत. मात्र आॅनलाईनचा उडालेला बोजवारा यामुळे दिवसभर रांगा लावून बसावे लागत आहे.भोर तालुका हा दुर्गम डोंगरी असून तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी अशिक्षित आहेत. त्यामुळे आॅनलाईन सेवा काय असते, अर्ज कसा भरायचा, याबाबत काहीच महिती नाही. शिवाय आॅनलाईन सेवा अत्यंत सथ गतीने सुरूअसून अनेकदा बंदच असते. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे सुमारे ५० ते ६० किलोमीटर अंतरावरुन २०० रुपये खर्च करुन आलेल्या शेतकºयाचा अर्ज भरला गेला नाही, तर त्याला पुन्हा यावे लागत असल्याने विनाकारण भुर्दंड बसत आहेत. जिल्हा बँक व तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सचिव यांनी शेतकºयांना कर्जमाफीबद्दल महिती देऊन शेतकºयांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाहीत. शासनाच्या जाचक अटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या कर्ज माफीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र असून अनेक शेतकरी कामानिमित्त पुणे मुंबईला राहतात. हातांचे ठसे जुळत नाहीत, कागदपत्रे नाहीत. त्यामुळे तालुक्यातील सुमारे एक हजार शेतकरी कर्जमाफीला मूकणार असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.भोर तालुक्यातील अल्पभूधारक (५ एकरच्या आत) असलेल्या ६७१९ शेतकरी सभासदांनी सुमारे ३४ कोटी ८९ लाख रुपये वेगवेगळ््या पिकांसाठी पिक कर्ज घेतले होते.भोर तालुक्यात १९७ गावांत खरीप व रब्बी पिकांसाठी ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा बँकेचे सुमारे २२ हजार ७४२ सभासद आहेत. त्यांना दरवर्षी सुमारे ३ लाखापर्यंतचे अल्पमुदतीचे पीककर्ज व मध्यम मुदतीचे बिनव्याजी कर्ज वाटप केले जाते. यावर्षी भोर तालुक्यातील ११ हजार ४४७ शेतकरी सभासांनी सुमारे ४५ कोटी ३२ लाखांचे कर्ज थकवले आहे. मात्र सुमारे ८०३६ सभासदांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतलेले सुमारे ५१ कोटीचे पीककर्ज ३१/३/२०१७ रोजी वेळेत भरलेले आहे. त्यांना कर्जाचे २५ टक्के माफी मिळणार आहे.शेतकºयांना कर्जमाफीसाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरुन माहिती द्यायची आहे. याबाबत शेतकºयांना माहिती नसून अनेक शेतकरी अशिक्षित आहेत. त्यामुळे शेतकºयांत संभ्रमावस्था आहेत. अनेक शेतकरी आजारी आहेत. कागदपत्रे नाहीत. त्यामुळे मुदतवाढ करणे गरजेचे आहे.- सुरेश राजिवडे, शेतकरी, म्हसर खुर्द

टॅग्स :Farmerशेतकरी