शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीवर वचक बसेल, असा दंड हवा : चित्रा वाघ; धामणेत पीडित कुटुंबाची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 13:02 IST

छेडछाडीसारख्या पहिल्याच प्रकरणात जबर दंड व शिक्षा झाली तर गुन्हेगाराचे नंतर गुन्हा करण्याचे धैर्यच होणार नाही, त्यामुळेच यासाठीच्या ३५४ कलमामध्ये ही तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

ठळक मुद्देमहिलांवरील अत्याचाराबाबत पोलिसांमधील संवेदनशीलता वाढवण्याचा गरज : चित्रा वाघ 'महिला, मुलींवरील अत्याचारांच्या बाबतीत समाज, पोलीस व सरकारने कठोर भूमिका घ्यावी'

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे ही चिंताजनक बाब आहे. छेडछाडीसारख्या पहिल्याच प्रकरणात जबर दंड व शिक्षा झाली तर गुन्हेगाराचे नंतर गुन्हा करण्याचे धैर्यच होणार नाही, त्यामुळेच यासाठीच्या ३५४ कलमामध्ये ही तरतूद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. वाघ यांनी धामणे या गावातील अत्याचाराने मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचा तपास त्वरेने व्हावा, अशी मागणी केली. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, उपाध्यक्ष हसीना इनामदार व अन्य महिला कार्यकर्त्या होत्या.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वाघ यांनी महिलांवरील अत्याचाराबाबत पोलिसांमधील संवेदनशीलता वाढवण्याचा गरज आहे असे मत व्यक्त केले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील गुन्हेगाराला नंतर न्यायालयात उपयोगी पडेल, असा पंचनामा व तपास केला जातो, असे त्या म्हणाल्या. कोंढवा येथील एका मुलीला मारहाण करण्याच्या प्रकारात बघ्यांनी मोबाइलमध्ये व्हिडीओ केला पण मध्ये पडून त्या मुलीला वाचवले नाही, यावरून समाजही संवेदनशीलता हरवत चालला असल्याचे दिसते आहे असे त्यांनी सांगितले.महिला, मुलींवरील अत्याचारांच्या बाबतीत समाज, पोलीस व सरकारने कठोर भूमिका घ्यायला हवी. पोलिसांकडे महिला दक्षता समित्या असतात, त्यातील महिलांना फक्त पंचनामा करण्यासाठी न वापरता पोलिसांनी समाजाचे प्रबोधन करण्यासाठीही वापरावे, असे मत वाघ यांनी व्यक्त केले. रेल्वे तसेच काही सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य वाय-फाय केले जात आहे. त्यामुळे तरुणांकडून तिथे मोबाइलचा वाटेल तसा वापर केला जातो व त्याचा त्रास महिलांना होतो. त्यामुळेच या धोरणाचाही फेरविचार व्हावा. कलमामधील बदल हे धोरण याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधीमंडळात आवाज उठवतील, असे वाघ यांनी सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे