शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

महसूलच्या योजनांमध्ये लोकसहभाग वाढवण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:11 IST

राजगुरुनगर : महसूल विभागाच्यावतीने शेतकरी, नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनात लोकसहभाग वाढण्यासाठी तळागाळापर्यत जनजागृती केली तर निश्चित योजनेची अंमलबजावणी चांगली ...

राजगुरुनगर : महसूल विभागाच्यावतीने शेतकरी, नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनात लोकसहभाग वाढण्यासाठी तळागाळापर्यत जनजागृती केली तर निश्चित योजनेची अंमलबजावणी चांगली होत असते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राजगुरुनगर येथे केले.

कोरोनामुळे महसूल विभागातील रखडलेल्या विविध नोंदींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत भरवण्यात येत आहे. बुधवारी भरलेल्या दुसरी फेरफार अदालत खेड मंडलस्तरावर सुरू असताना जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी भेट देऊन उपस्थित शेतकरी आणि नागरिकांच्या नोंदीचे पत्राचे वाटप केले. त्यावेळी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांत विक्रांत चव्हाण, तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे, महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे, मंडलाधिकारी सविता घुमटकर, तलाठी फौजी बी. के. लंघे, मनीषा राऊत, वर्षा धामणे, सचिन जाधव, वैजनाथ मुंगारे, पल्लवी पंचवटे, शुंभागी देसाई, लिपिक सतीश धस, संकेत तनपुरे आदिसह माजी सभापती सतीश राक्षे आणि तक्रारदार शेतकरी उपस्थित होते.

डॉ. राजेश देशमुख म्हणाले की, कोरोनामुळे महसूल विभागतील अनेक कामे थांबली होेती. मात्र, आता या फेरफार अदालतीमुळे प्रलंबित असलेली कामे होत आहे. जिल्ह्यातील जवळपास १ लाख ६० हजार तक्रारी, नोंदी आदी विविध प्रश्न महिनाभरात निकाली निघाल्यामुळे राज्यात २१ क्रमांकावर असणारा पुणे जिल्हा ८ व्या क्रमांकावर आला आहे. येत्या दोन तीन महिन्यांत प्रलंबित अर्जाचा निपटारा करून पुणे जिल्हा पहिल्या तीन क्रमांकात आणण्याचा विश्वास डॉ. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

जिल्ह्यातील पहिल्या फेरफार अदालतीत २५०० विविध नोंदी निर्गत करण्यात आल्या असुन ७/१२ उतारा आणि संगणक चुका असेल तर सुमोटोखाली दुरुस्त केल्या जात आहेत. संगणकीकरणामुळे ७/१२ उतारा डाऊनलोड करण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. आता घरपोच ७/१२ चा उतारा नागरिकांना आणि शेतक-यांना मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

...तर या नोंदी प्रलंबित राहू शकतात

जर ७/१२ उताऱ्यात लिखित नोंदी आणि संगणकीकृत नोंदीत चूक झाली असेल तर त्यासाठी सुमोटो वापरून ७/१२ नोंद दुरुस्त केली जात असते. त्यासाठी १५५ चा प्रस्तावाची आवश्यकता नसते. मात्र एखाद्या ७/१२, ८अ मध्ये क्षेत्रातील वाटप तफावतीमुळे, फेरफारातील चुका आदिसाठी १५५ खाली प्रस्तावाखाली संबंधित खातेदारांना नोटीस काढून सर्वसहमतीने दुरुस्त करणे आवश्यक असल्याने या नोंदी प्रलंबित राहू शकतात, असे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.